शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतचा विशेष भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाकाळात राज्यासह परराज्यातही एसटी धावत होत्या. त्यासाठी दरदिवसाला ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाकाळात राज्यासह परराज्यातही एसटी धावत होत्या. त्यासाठी दरदिवसाला ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. त्यानुसार ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंतचा भत्ता दिला आहे; परंतु त्यानंतर डिसेंबरपर्यंत भत्ता अद्यापही त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे एसटीच्या संघटनांनी तो मिळावा यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन केले होते. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू केली होती. त्यानुसार शहराच्या विविध भागांतून या बस गुजरात, उत्तर प्रदेश आदींसह राज्याच्या इतर भागातही धावल्या होत्या. प्रवाशांना सोडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये दररोजचा भत्ता दिला जाणार होता. जिवावर उदार होऊन वाहक आणि चालकांनी ही सेवा केली. अनेकांना आपल्या घरी सोडण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांना हा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता.

यासंदर्भात एसटी विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी ऑगस्टपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आल्याची माहिती दिली; परंतु त्यानंतर लॉकडाऊनमध्येही शिथिलता आली होती. तसेच इतर नियमही शिथिल केले होते. त्यामुळे डिसेंबरपर्यंतचा भत्ता दिला गेला नसल्याचे सांगितले.

२३४ जण कोरोनाग्रस्त, तर ११ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील २३४ एसटी कर्मचाऱ्यांना याच कालावधीत कोरोनाची बाधा झाली असून यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा प्रोत्साहन भत्ता मिळणे गरजेचे आहे.

कामगारांना डिसेंबरपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. त्यांनी संपूर्ण वर्षभर काम केले असल्याने त्यांना तो मिळालाच पाहिजे, अशी आमचीदेखील इच्छा आहे.

(सचिन शिंदे, इंटक, ठाणे जिल्हा अध्यक्ष)

आम्ही ऑगस्टपर्यंतचा भत्ता कर्मचाऱ्यांना दिलेला आहे; परंतु ऑगस्टनंतर शिथिलता आल्याने त्यांना भत्ता दिलेला नाही. शासनाने जर भत्ता देण्यास सांगितले तर तो नक्कीच देऊ.

(विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक)