शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

पगार होताच पुन्हा एटीएममध्ये खडखडाट

By admin | Updated: May 8, 2017 06:15 IST

नोटाबंदीनंतर चार महिने रोख रकमेच्या चणचणीचा सामना करणाऱ्या नोकरदारांना गेल्या महिन्याप्रमाणे आताही पगार जमा होताच

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नोटाबंदीनंतर चार महिने रोख रकमेच्या चणचणीचा सामना करणाऱ्या नोकरदारांना गेल्या महिन्याप्रमाणे आताही पगार जमा होताच पुन्हा बंद एटीएमचा सामना करावा लागतो आहे. नो कॅशचे बोर्ड लावलेली एटीएम पुन्हा ग्राहकांना वाकुल्या दाखवून लागली आहेत. अर्थव्यवस्थेपेक्षा एटीएमच कॅशलेस झाली आहेत.केंद्रातील मोदी करकारने भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या निर्दालनासाठी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सोमवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही रोख गंगाजळीची परिस्थिती सुधारलेली नाही, हेच एटीएमच्या खडखडाटातून दिसून आले. गेल्या महिन्यातच सुट्टीचे नियोजन करून बाहेरगावी जाण्याच्या विचारात असलेल्यांना एटीएमबंदीचा फटका बसला होता. पैशांसाठी रांगा लागल्या होत्या. तशाच रांगा आता पुन्हा लावण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. नोटांची चणचण पुन्हा का सुरू झाली, याचे कारण कोणालाच ठावूक नाही. सध्या सुट्यांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा स्थितीत रोख रकमेची मागणी एरव्हीपेक्षा घटली आहे, तरीही एटीएम यंत्रांत नोटांचा खडखडाट दिसून येतो. त्यामुळे आधी नोटाबंदीच्या काळात चार महिने आणि नंतर दरमहा नोटांच्या शोधात फिरणारे ग्राहक पुन्हा ठाणे, कल्याण, डोंबिवलीत दिसू लागले आहेत.कॅशलेस फसले अर्थव्यवस्था डिजिटल करण्याच्या घोषणेनंतरही या व्यवहारांबाबत सुरूवातीला असलेला उत्साह खूपच कमी झाला आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे नियमितपणे होणारे व्यवहार त्याचप्रमाणात सुरू आहेत. काही प्रमाणात अ‍ॅपचा वापर वाढला आहे. पण व्यवहारांचे प्रमाण त्या तुलनेते वाढलेले नाही. विजेची, मोबाईलची बिले, हॉटेलचे बिल भरताना त्यावर शुल्क आकारले जात असल्याने पुन्हा रोख रकमा भरण्याकडे कल वाढला आहे.परराज्यांतून नोटांचा नाद सोडलागेल्या महिन्यात अनेक बँकांनी उत्तरेकडील राज्यांतील आपल्या शाखांतून पैसे मागवले होते. त्यामुळे ठाणे, डोंबिवलीतील बँकांनी आपले खास कर्मचारी नियुक्त करून तेथून पेट्या भरून रोख रकमा आणल्या. पण तो खर्चही आता पेलवेनासा झाला आहे. त्यामुळे बँंकांनी या महिन्यात तोही नाद सोडला आहे. २००० च्या नोटा कमीगेल्या महिन्याप्रमाणेच आताही दोन हजार रूपयांच्या नोटांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याऐवजी पाचशेच्या नोटा तुलनेने अधिक प्रमाणात आहेत. एटीएममधूनही गेल्या महिन्यात दोन हजारांच्या नोटा खूप कमी प्रमाणात मिळत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. नव्याने एटीएमचा शोधच्एटीएम कॅशलेस झाल्याने पुन्हा नोटांचा शोध घेत फिरणारे ग्राहक, कॅश असलेल्या एटीएमसमोर रांगा नव्याने दिसू लागल्या आहेत. च्रोख रकमेची ही चणचण ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर अशा शहरांत मुरबाड-शहापूरसारख्या निमशहरी भागांतही जाणवते आहे. पण एटीएमसमोरील नो कॅशचे बोर्ड हटलेले नाहीत.