शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पालकमंत्र्यांचा दौरा संपताच पालिका प्रशासनाने फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

चक्रीवादळाचा फटका अंबरनाथ तालुक्यालादेखील बसला होता. या वादळात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. पालकमंत्री ...

चक्रीवादळाचा फटका अंबरनाथ तालुक्यालादेखील बसला होता. या वादळात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. पालकमंत्री येणार म्हणून बारकुपाडा परिसरातील फासेपारधी वस्तीमधील घरांवर पडलेल्या वृक्षांची छाटणी सुरू करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री यांचा दौरा संपताच धोकादायक वृक्ष आहे त्या स्थितीत ठेवून पालिका प्रशासन निघून गेले. गेल्या तीन दिवसांपासून याबाबत सतत पाठपुरावा करूनदेखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर जाधव यांनी केला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून, काही घरांचे छत क्षतीग्रस्त झाले आहे. अनेक घरांवर वृक्षांच्या फांद्या अडकल्या असून, त्या कधीही पडू शकतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे वादळ गेल्यावरही या भागातील नागरिकांचा जीव टांगणीलाच आहे.

मंत्री आले म्हणून बारकुपाडा भागात अनेक अधिकारी येऊन गेले. मात्र, मंत्र्यांचे आदेश धुडकावून या भागात पुन्हा पालिका प्रशासन फिरकलेच नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. बारकुपाड्याला लागलीच मदत पोहोचवावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र मदत तर सोडाच, परंतु पालिका प्रशासनाने घरांवर पडलेले वृक्षदेखील हटविले नाहीत. धोकादायक स्थितीत असलेल्या या घरांमधील रहिवासी हे सुधीर जाधव यांच्या कार्यालयात वास्तव्यास आले आहेत. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मदत करीत असताना पालिका प्रशासन मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

----------

फोटो आहे.