शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

पालकमंत्र्यांचा दौरा संपताच पालिका प्रशासनाने फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

चक्रीवादळाचा फटका अंबरनाथ तालुक्यालादेखील बसला होता. या वादळात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. पालकमंत्री ...

चक्रीवादळाचा फटका अंबरनाथ तालुक्यालादेखील बसला होता. या वादळात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला. पालकमंत्री येणार म्हणून बारकुपाडा परिसरातील फासेपारधी वस्तीमधील घरांवर पडलेल्या वृक्षांची छाटणी सुरू करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री यांचा दौरा संपताच धोकादायक वृक्ष आहे त्या स्थितीत ठेवून पालिका प्रशासन निघून गेले. गेल्या तीन दिवसांपासून याबाबत सतत पाठपुरावा करूनदेखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुधीर जाधव यांनी केला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून, काही घरांचे छत क्षतीग्रस्त झाले आहे. अनेक घरांवर वृक्षांच्या फांद्या अडकल्या असून, त्या कधीही पडू शकतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे वादळ गेल्यावरही या भागातील नागरिकांचा जीव टांगणीलाच आहे.

मंत्री आले म्हणून बारकुपाडा भागात अनेक अधिकारी येऊन गेले. मात्र, मंत्र्यांचे आदेश धुडकावून या भागात पुन्हा पालिका प्रशासन फिरकलेच नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. बारकुपाड्याला लागलीच मदत पोहोचवावी असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र मदत तर सोडाच, परंतु पालिका प्रशासनाने घरांवर पडलेले वृक्षदेखील हटविले नाहीत. धोकादायक स्थितीत असलेल्या या घरांमधील रहिवासी हे सुधीर जाधव यांच्या कार्यालयात वास्तव्यास आले आहेत. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मदत करीत असताना पालिका प्रशासन मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

----------

फोटो आहे.