शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

काही केले, काही करायचे राहून गेले - संजीव जयस्वाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:16 IST

आयुक्तपदाची चार वर्षे : नव्या वर्षात नवे संकल्प

ठाणे : गेल्या चार वर्षांत या शहरासाठी सतत काहीतरी करायचा प्रयत्न केला असला, तरी अजूनही काही करायचे बाकी राहून गेले असल्याची कबुली महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी दिली. महापालिका आयुक्त म्हणून चार वर्षांचा मोठा टप्पा पूर्ण करताना त्यांनी नवीन वर्षातील नवीन कामांची आखणी करण्यासाठी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

गेल्या चार वर्षांत आपण लोकहिताच्या, शहराच्या विकासाच्या विविध योजना हाती घेतल्या. त्यातील योजना प्रगतीपथावर आहेत, तर काही सुरू झाल्या, परंतु संथगतीने सुरू आहेत. काही योजना विविध कारणांमुळे अद्यापही सुरू झाल्या नसल्या, तरी त्या प्रामाणिकपणे या वर्षात सुरू करता येतील का किंवा करताच येणार नसतील, तर तसे मान्य करून त्याऐवजी नवीन काही योजना राबवता येतील का, याचा विचार करता येईल, असेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. ठाणे शहरासाठी मी जे काही करायचा प्रयत्न केला, तो प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण सर्वांनी यापुढेही त्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे समाजाप्रति काम करण्याचे आवाहन जयस्वाल यांनी सर्व अधिकाºयांना करतानाच काही करायचेही राहून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी, नागरिकांनी साथ दिली, त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आपली निष्ठा नागरिकांप्रति असल्याचे सांगून यापुढे सामाजिक आणि लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगून संबंधित विषय फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :tmcठाणे महापालिका