शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

उद्धव ठाकरे गटाचे आणखी काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

By अजित मांडके | Updated: July 6, 2023 19:00 IST

लवकरच स्फोट होईल, आमदार सरनाईक यांचा दावा

ठाणे :  शिंदे गटाचे आठ ते दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य विनायक राऊत यांनी केले होते. मात्र या केवळ वावड्या असून ठाकरे गटाचेच काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून लवकरच स्फोट होईल असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. दुसरीकडे मंत्रिपदावरून दोन आमदारांमध्ये संघर्ष झाला असल्याच्या बातम्या टीआरपी वाढवण्यासाठी पेरल्या जात असून सरकार चांगले काम करत असल्याने हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रावादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

ठाण्यातील समता नगर परिसरातील घरांच्या संदर्भात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्य्या सरकार मधील प्रवेशानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. मात्र यामध्ये कोणत्याच प्रकारचे तथ्य नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघातील विकासकांमाच्या संदर्भात चर्चा केली असून कोणत्याच मतदार संघात निधी अभावी विकास कामे थांबणार नाही अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली असून त्यामुळे आमदार नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाचेच आणखी काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा सरनाईक यांनी यावेळी केला. 

 मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यास सरनाईक यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चा होत्या. मात्र मला मंत्रिपद मिळणार हे कोणत्या ज्योतिषाने सांगितले असा उलट प्रश्न सरनाईक यांनी प्रसार माध्यमांना केला. दुसरीकडे सत्तेत वाटेकरी वाढले असले तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले अनेक वर्ष काम करत असून हे दोन्ही नेते शब्द पाळणारे नेते असल्याचे त्यांनी सांगितले.