शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

समस्यांबाबत शासन आणि प्रशासनाला जाबविचारुन जनरेट्याने प्रश्न सोडवा - मेजर मनिषसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 17:34 IST

मेजर मनिषसिंग यांनी युवकांशी संवाद साधला व त्यांना आपल्या ओघवत्या शैलीत मार्दर्शन केले.

ठळक मुद्देमेजर मनिषसिंग यांनी साधला युवकांशी संवाद शासन आणि प्रशासनाला जाब विचारा : मेजर मनिष सिंगदुसऱयांकडून अपेक्षा करु नका. विचारांनाऍक्शनची जोड द्या : मेजर मनिष सिंग

ठाणे : कोणत्याही समस्या, प्रश्न असलेतर शासन आणि प्रशासनाकडे बोट दाखविलेजाते. तुमच्या आजुबाजुला दिसणाऱया समस्या,प्रश्नांबाबत तुम्ही शासन आणि प्रशासनाला जाबविचारा. जनरेट्याने ते प्रश्न सोडविणे त्यांना भागआहे. सतत वाचन करत रहा, असे मोलाचेमार्गदर्शन शौर्य चक्र प्राप्त मेजर मनिष सिंगयांनी आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्रमहाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांनाकेले.

रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशनसोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठमहाविद्यालयात मेजर मनिष सिंग यांचाविद्यार्थ्यांशी संवादात्मक कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आलाहोता. मेजर मनिष सिंग यांनी मिष्कील पणसडेतोडपणे मार्गदर्शन करत अनेक मुद्यांना हातघातला. प्रारंभी मेजर मनिष सिंग यांचेमहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखितेयांनी स्वागत केले. यावेळी व्यासपिठावरभाग्यश्री फाऊंडेशचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र खेर,प्राचार्य ऍड. सुयश प्रधान, विनायक जोशी,सिध्देश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते.भाग्यश्री फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा, प्रसिध्दलेखिका शिल्पा खेर यांनी मेजर मनिष सिंगयांच्या कतृत्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.लष्कराच्या शौर्याचे चित्रपट बनतात आणि तेपाहिले जातात. हाऊ ईज द जोश बोलले जाते.चित्रपटाच्या नायकांकडे पाहून आम्ही कोण असाप्रश्न पडतो. मात्र चित्रपट आणि वास्तव यातफरक आहे. सर्जिकल स्ट्राईक इतके सोपे नसते.रात्रीच्या काळोखात गुपचुप जाऊन काम फत्तेकेल्यानंतर केलेल्या कामाचा आवाज होतो.भारतीय सैन्याला आज पर्यंत कोठेही अपयशआलेले नाही. त्यामुळे चित्रपट कमी बघा आणिवाचनावर अधिक भर द्या, असा सल्ला मेजरमनिष सिंग यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

पुलवाना येथे घडलेल्या दहशदवादी हल्ल्यातएकत्रित अनेक जवान शहीद झाल्यानंतर देशहादरला. मात्र रोज जवान शहीद होत आहेत.आपला एक जरी जवान शहीद झाला तरी तेयुध्दच आहे, असे मेजर मनिष सिंग म्हणाले. 

 देशभक्ती हा चर्चा करण्याचा विषय नाही. प्रत्येकजवान हा देशाची ड्युटी करत असतो. आईवडील, शिक्षक हे मुलांना शिकवितात तसेचसफाई कामगार स्वच्छतेचे काम करतो, ही पणएक ड्युटीच आहे. ते ती प्रामाणिकपणे करतात.विद्यार्थ्यांनीही आपली वैयक्तिक ड्युटी काय आहेती ओळखली पाहिजे. मी स्वच्छता ठेविन.परिसरातील साफसफाई होत नसेल तर मीनगरसेवकाला जाब विचारेन. झुंड एकत्र येऊनदेशभक्ती होत नाही. जबाबदारीने वागणे आणिस्वत: योगदान देणे ही देशभक्ती आहे असे मेजरमनिष सिंग म्हणाले. काश्मिर मधील नागरिकांबद्दल नेहमीचप्रश्नचिन्ह उभे केले जाते. मात्र इतर राज्यांत कायपरिस्थिती आहे. मी गोळी लागुन जखमी झालोतेव्हा मला मदतीचा हात बारामुल्लामधीलस्थानिकानेच दिला, अशी आठवण यावेळी मेजरमनिष सिंग यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांनासांगितली.

शासन कसे असले पाहिजे हे तुम्ही ठरवता.लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे.लोकशाहीच्या प्रवाहात राहून शासनाला सुईसारखे टोचत राहिले पाहिजे. मग ते कोणाचेहीसरकार असू दे. निर्भयाच्या घटनेनंतर कायद्यातमहत्वपूर्ण बदल झाले हे फक्त जनरेट्यामुळेशक्य झाल्याचे मेजर मनिष सिंग म्हणाले.आयुष्य मजेत जगा. वाचा आणि विचार करा.भोवतालच्या प्रश्नांची सोडवणुक कशी होईल तेबघा. दुसऱयांकडून अपेक्षा करु नका. विचारांनाऍक्शनची जोड द्या असे मेजर मनिष सिंग म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई