शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाण्यातील साैरऊर्जा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:57 IST

वीज जास्त दराने विकत घ्यावी लागणार असल्याने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले हे सौरऊर्जेचे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने सौरऊर्जेचे विविध प्रकल्प हाती घेऊन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला होता. महापालिकेने पीपीपी तत्त्वावर १० मेगावॉट सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पैकी उथळसर, माजिवडा आणि वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयांवर सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे पालिकेने तयार केलेली वीज, वीज मंडळाला कमी दरात विकावी लागणार आहे. त्याचप्रमाणे, तिच वीज जास्त दराने विकत घ्यावी लागणार असल्याने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले हे सौरऊर्जेचे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘सोलर सिटी’ म्हणून ठाणे शहराची निवड झाली असल्याने सौरऊर्जेच्या माध्यमातून जास्तीतजास्त वीजनिर्मिती आणि वापर करण्याचे नियोजन करण्यास २०१५ पासूनच प्रशासनाने शहरात सोलर प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, अग्निशमन केंद्र, आयुक्त व महापौर बंगला या ठिकाणी सुमारे ३६ हजार लीटर क्षमतेचे सोलर वॉटर हिटर बसवले, तर बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या इमारतींवरही ते बसविण्यात येत आहेत.

डायघर येथील ५ एकर जागेवर सौर उर्जा पॅनल उभारल्यानंतर त्या खालील जागेचा वापर स्मार्ट व सोलर सिटी कार्यक्रमासाठी करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे, तसेच शहाड टेमघर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी दोन मेगावॅट आणि कोपरी मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी १ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे प्रस्तावित होते. याच कार्यक्रमाचे पुढचे पाऊल पालिका प्रशासनाने उचलले असून, महापालिकेने आपल्या मालकीची विविध आरोग्य केंद्रे, प्रभाग समिती कार्यालये, अग्निशमन केंद्रे, वाहतूक नियंत्रक, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आणि सॅटिस यावर सौरयंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार केले होते.

खासगी वीजनिर्मिती कंपन्या ज्या पद्धतीने वीजविक्री करतात, त्या पद्धतीने महापालिकेनेही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात यश आल्यास पालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार होता. मात्र, सरकारच्या नव्या धोरणामुळे हा सर्व प्रकल्प अडचणीत सापडणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :thaneठाणे