शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ठाण्यातील साैरऊर्जा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:57 IST

वीज जास्त दराने विकत घ्यावी लागणार असल्याने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले हे सौरऊर्जेचे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने सौरऊर्जेचे विविध प्रकल्प हाती घेऊन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला होता. महापालिकेने पीपीपी तत्त्वावर १० मेगावॉट सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पैकी उथळसर, माजिवडा आणि वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयांवर सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे पालिकेने तयार केलेली वीज, वीज मंडळाला कमी दरात विकावी लागणार आहे. त्याचप्रमाणे, तिच वीज जास्त दराने विकत घ्यावी लागणार असल्याने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले हे सौरऊर्जेचे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘सोलर सिटी’ म्हणून ठाणे शहराची निवड झाली असल्याने सौरऊर्जेच्या माध्यमातून जास्तीतजास्त वीजनिर्मिती आणि वापर करण्याचे नियोजन करण्यास २०१५ पासूनच प्रशासनाने शहरात सोलर प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, अग्निशमन केंद्र, आयुक्त व महापौर बंगला या ठिकाणी सुमारे ३६ हजार लीटर क्षमतेचे सोलर वॉटर हिटर बसवले, तर बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या इमारतींवरही ते बसविण्यात येत आहेत.

डायघर येथील ५ एकर जागेवर सौर उर्जा पॅनल उभारल्यानंतर त्या खालील जागेचा वापर स्मार्ट व सोलर सिटी कार्यक्रमासाठी करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे, तसेच शहाड टेमघर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी दोन मेगावॅट आणि कोपरी मलनिस्सारण केंद्राच्या ठिकाणी १ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे प्रस्तावित होते. याच कार्यक्रमाचे पुढचे पाऊल पालिका प्रशासनाने उचलले असून, महापालिकेने आपल्या मालकीची विविध आरोग्य केंद्रे, प्रभाग समिती कार्यालये, अग्निशमन केंद्रे, वाहतूक नियंत्रक, डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आणि सॅटिस यावर सौरयंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव तयार केले होते.

खासगी वीजनिर्मिती कंपन्या ज्या पद्धतीने वीजविक्री करतात, त्या पद्धतीने महापालिकेनेही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात यश आल्यास पालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार होता. मात्र, सरकारच्या नव्या धोरणामुळे हा सर्व प्रकल्प अडचणीत सापडणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :thaneठाणे