शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ग्रामस्थांनीच सुरू केली मृदासंधारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 00:09 IST

बेरोजगारीवर केली मात; शासनाने विलंब केल्याने शोधला पर्याय

- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोना महामारीच्या विळख्यात अधिकाधिक जखडले जाताना आर्थिक, बेरोजगारीचेही सावट गडद होत आहे. श्रमिकांसाठी प्रत्येक दिवस भूक, पैशाची चणचण आणि भविष्याची चिंता वाढवणारा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गमभागातील मजुरांनी १५ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे रोजगार मागणी केली. पण त्यास विलंब झाल्यामुळे मुरबाडच्या माळशेज घाट, डोंगर सपाटीच्या दहा गावांतील मजुरांनी जागतिक वसुंधरा दिनाच्या मुहूर्तावर बुधवारी वन जमिनीवर जल व मृदा संधारणाची, गाळ काढण्याची, नर्सरीची कामे या रखरखत्या उन्हात हाती घेऊन मजुरीच्या समस्येवर मात केली आहे.कोरोनाच्या संकटावर मात करीत असतानाच जागतिक वसुंधरा दिनाचा विसर पडू न देता मुरबाडच्या सामूहिक वनहक्कधारक गावांतील आदिवासी मजुरांनी सामाजिक अंतराचे नियम पाळून यंदा हा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.शासकीय यंत्रणेला कामे सुचिवण्यात विलंब झाल्याने ती सुरू करायला किती वेळ लागेल तोपर्यंत करायचे काय काय अशी चर्चा सुरू असताना या सामूहिक वनहक्क धारक गांवकऱ्यांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या पुढाकाराने जंगल, डोंगर, दºया-खोºयात जल व मृदा संधारणाची कामे, जूनमधील वनीकरणाच्या नर्सरी, तलाव, बंधारे गाळमुक्त करण्यासाठी साफसफाईची कामे हाती घेतली. तर शिसेवाडीच्या मजुरांनी घायपातीची नर्सरी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.आदिवासींनी आपल्या बेरोजगारीच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वत:च रोजगार निर्मितीचा निर्णय घेऊन कामाला सुरूवात केल्याच्या वृत्ताला श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. इंदवी तुळपुळे यांनी दुजोरा दिला.दहा गावांत सुरू झाली कामेयात मुरबाड तालुक्याच्या दुर्गम भागातील शिसेवाडी, दिवाणपाडा, केव्हारवाडी, पेजवाडी, शिरवाडी अशा १० गावांच्या मजुरांनी जल संवर्धनाच्या कामांसह सामूहिक वनीकरणासाठी खड्डे खणणे, गॅबियान बंधारे बांधण्याचे नियोजन केले आहे.जंगल वणवा प्रतिबंधक जाळरेषा हाती घेतल्या आहेत, डोंगरउतारावरील पावसाचे पाणी वाहून नेणाºया पाणचारीचे काम सुरू केले.जंगलाच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीची कामेही काही गावे करणार आहेत.शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत अनेक गावेपर्यावरण संवर्धन आराखड्यातील कामांसाठी ठाणे जिल्हा नियोजन समितीने या कामांसाठी वनविभागामार्फत २०१९-२० मध्ये या निधीची तरतूद केलेली आहे. पण मार्च व अर्ध्या एप्रिल महिन्यात काम करता आलेच नाही. आता मात्र या गावांनी एकमताने निर्णय घेऊन वसुंधरा दिनाचे औचित्य साधून मृदा संधारणाची कामे, नर्सरी, गाळमुक्त बंधारे करण्यासाठी प्रारंभ केला आहे.यास अनुसरु न शासनाकडे शिरसोनवाडीतील १४ मजुरांनी शासनाकडे काम मागणी केली आहे. आणखी अनेक गावे प्रतीक्षेत आहेत. येणाºया हंगामासाठी बियाणे, खते, खावटी यासाठी तरतूद करणे आवश्यक आहे.आगामी दीड महिन्यात जर रोजगार मिळाला नाही तर हा आदिवासी अल्प भूधारक शेतकरी व वन प्लॉट धारक पावसाळ्यात आपली शेती कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. पण त्यावर वेळीच मात करण्याच्या दृष्टीने काही गावांनी सुरू केलेली कामे हेच या प्रश्नाचे खरे उत्तर आहे, असे सूचक वक्तव्य ही अ‍ॅड. तुळपुळे यांनी केले आहे.