शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समाजाने स्त्री-पुरुष समानता आचरणात आणावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : प्रजनन अवयव सोडल्यास स्त्री व पुरुषात काहीही नैसर्गिक भेद नाहीत. तरीदेखील महिलांबरोबर भेदाभेद केला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : प्रजनन अवयव सोडल्यास स्त्री व पुरुषात काहीही नैसर्गिक भेद नाहीत. तरीदेखील महिलांबरोबर भेदाभेद केला जातो. शिक्षण, जेवण, पगार, घरातील निर्णय प्रक्रिया, याबाबत भेदाभेद आजही अस्तित्वात आहे. घर दोघांचे, मुले दोघांची मग जास्त जबाबदारी स्त्रीकडेच का जाते? असे प्रश्न उपस्थित करत, स्त्री-पुरुष समानता म्हणजे दोघांना समान संधी व समान सन्मान असणे आवश्यक आहे. सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले असल्याने, समाजाने स्त्री-पुरुष समानता आचरणात आणावी, असे मत आंतरराष्ट्रीय जीवन प्रशिक्षक उल्का शुक्ल यांनी मांडले.

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला समता विचार प्रसारक संस्थेने घेतलेल्या युवा मेळाव्यात ‘स्त्री-पुरुष समानता, समाजाला देईल सुदृढता’ या विषयावर शुक्ल बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते.

स्त्रिया-पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे नाव कमवत आहेत. शारीरिक, मानसिक क्षमता असो किंवा शैक्षणिक, व्यवसाय, राजकीय आणि प्रशासकीय आदी जवळजवळ सर्वच क्षेत्रात महिलांनीही कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे स्त्रिया एक माणूस म्हणून पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही, असेही शुक्ल यांनी सांगितले.

उपस्थित मुली व मुलांचे गट बनवून, जन्माला आल्यापासून २० वर्षे वयापर्यंत विविध टप्प्यांवर मुली-मुलांची वाढ होत असताना त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थिती, अनुकरण आणि स्वभाव व वागणुकीत होणारे बदल या बाबतीत त्यांनी सर्वांना बोलते केले. बाळाच्या पालन पोषणाची प्रक्रिया घडताना कुटुंबात मुलगी म्हणून दुय्यम वागणूक मिळते का? मूल हवे की नको? आदीबाबत कुटुंबात चर्चा होते का? स्त्रीचा स्वतःच्या शरीरावर हक्क आहे का? गर्भधारणा करणे किंवा गर्भपात करणे हा स्त्रीचा हक्क आहे का? आदी प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेची एकलव्य कार्यकर्ता अक्षता दंडवते यांनी केले. पाहुण्यांची ओळख संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी तर, आभार ओम गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जोशी, सचिव हर्षलता कदम, सहसचिव अनुजा लोहार आणि सहखजिनदार अजय भोसले आदी उपस्थित होते.

‘विचार करूनच व्यक्त व्हा’

शेवटी शुक्ल म्हणाल्या की, ‘आजच्या एकूण परिस्थितीबाबत निरीक्षणे करा, समजून घ्या आणि विचार करा, मग व्यक्त व्हा. व्यक्त होण्याची अनेक माध्यमे आहेत. त्याचा उपयोग करा.’

---------------------