शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्ये कृतीतून दिसण्याची गरज : कवी अशोक बागवे यांचे ठाण्यात प्रतिपादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:24 IST

डॉ. शाहू रसाळ यांच्या ‘प्रेमात खरोखर जग जगते’ आणि ‘कविता: महात्मा गांधी आणि इतर दिवंगतांच्या नावे’ या दोन काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.

ठळक मुद्दे डॉ. शाहू रसाळ यांच्या काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन कृतीतून समाजसेवेचा पसारा वाढला पाहिजे : कवी अशोक बागवेवंचितांचे अश्रू मला माझेच वाटतात : डॉ. शाहू रसाळ

ठाणे  :  सामाजिक बांधीलकी मानूंन कार्य करणारे अनेक आहेत. पण या कार्यासाठी तन - मन - धन वेचुन कार्य करण्याची नितांत गरज आहे . प्रत्येकाच्या सामाजिक  कृतीतून समाजसेवेचा पसारा वाढला पाहिजे ," असे मत कवी अशोक बागवे यांनी ठाण्यात व्यक्त केले .

सहजीवन फाउंडेशन आणि शारदा प्रकाशन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी डॉ . शाहू रसाळ यांच्या ' प्रेमात खरोखर जग जगते ," आणि महात्मा गांधी आणि इतर दिवगंताच्या नावे " या दोन काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते . यावेळी व्यासपीठावर नानजी खिमजी ठक्कर , कवयित्री मेघना साने  ,डॉ . शाहु रसाळ , कविता राजपूत , राजेन्द्र गायकवाड़ ई . मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कवी बागवे म्हणाले ", डॉ . शाहू रसाळ यांनी नेत्रतन्य डॉ . तात्याराव लहाने यांच्या पावलावर पाऊल ठेवलेले आहे. हजारो दृष्टिहिनाना दृष्टि मिळवुन दिलेली आहे  . वाढ़दिवसानिमित्त डॉ . शाहू रसाळ दरवर्षी मोफत ऑपरेशन करीत आहेत . गरजवंताला मदतीचा हात देणारे  डॉ. रसाळ  यांनी आपल्या कृतीतून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. डॉ . शाहू रसाळ यांनी केवळ सामाजिक आशयाच्या कविता लिहिल्या नाहीत तर सामाजिक कार्याचा मंत्र  आपल्या कृतीतून अंगीकारलेला आहे . यावेळी बोलताना डॉ . शाहू रसाळ म्हणाले ", माझे बालपण अत्यंत खड़तर गेले . मामानी माझे शिक्षण पूर्ण केले . त्यामुळे वंचितांचे अश्रू मला माझेच वाटतात. प्रत्येकाने आपापल्या परिने सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवावा. "ठाण्यातील  हार्ट पेशंटसाठी अद्ययावत  रुग्णालय  उभारन्याचे काम जोरात सुरू असल्याचे सांगून नानजीभाई  खिमजी ठक्कर म्हणाले " , ठाण्यातील नागरिकाना  आजारपण्याच्या कोणत्याही उपचारसाठी मुलुंडची वेश ओलांडायची गरज नाही . अत्याधुनिक उपचार देणारे रुग्णालय ठाण्यात उभारले जाणार असून या रुग्णालयात हृदयरोग मोफत बरा केला जाणार आहे . डॉ. शाहू रसाळ यांच्यासारख्या सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या सेवाभावी माणसांमुळे हे स्वप्न पुर्णत्वला जाणार आहे . " खासदार राजन विचारे यांनीही डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . नानजी खिमजी ठक्कर यांना रूग्णमित्र पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . जुई प्रधान हिने काव्यसंग्रहातील काही निवडक कविता सादर करून उपस्तिथांची दाद मिळवली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले .' सहजीवन संगीत संध्या ' या  वाद्यवृंदातील अनेक गायक - गायिकानी विविध गाणी सादर करून  कार्यक्रमाची सुरूवात केली . डॉ. शाहु रसाळ आणि प्रीती निमकर यांनी अनेक द्वंद्वगीते सादर केली. सीकेपी हॉलमधे तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमासाठी अनेक रसिक ठाणेकर उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई