शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

सामाजिक कार्ये कृतीतून दिसण्याची गरज : कवी अशोक बागवे यांचे ठाण्यात प्रतिपादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:24 IST

डॉ. शाहू रसाळ यांच्या ‘प्रेमात खरोखर जग जगते’ आणि ‘कविता: महात्मा गांधी आणि इतर दिवंगतांच्या नावे’ या दोन काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले.

ठळक मुद्दे डॉ. शाहू रसाळ यांच्या काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन कृतीतून समाजसेवेचा पसारा वाढला पाहिजे : कवी अशोक बागवेवंचितांचे अश्रू मला माझेच वाटतात : डॉ. शाहू रसाळ

ठाणे  :  सामाजिक बांधीलकी मानूंन कार्य करणारे अनेक आहेत. पण या कार्यासाठी तन - मन - धन वेचुन कार्य करण्याची नितांत गरज आहे . प्रत्येकाच्या सामाजिक  कृतीतून समाजसेवेचा पसारा वाढला पाहिजे ," असे मत कवी अशोक बागवे यांनी ठाण्यात व्यक्त केले .

सहजीवन फाउंडेशन आणि शारदा प्रकाशन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी डॉ . शाहू रसाळ यांच्या ' प्रेमात खरोखर जग जगते ," आणि महात्मा गांधी आणि इतर दिवगंताच्या नावे " या दोन काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते . यावेळी व्यासपीठावर नानजी खिमजी ठक्कर , कवयित्री मेघना साने  ,डॉ . शाहु रसाळ , कविता राजपूत , राजेन्द्र गायकवाड़ ई . मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना कवी बागवे म्हणाले ", डॉ . शाहू रसाळ यांनी नेत्रतन्य डॉ . तात्याराव लहाने यांच्या पावलावर पाऊल ठेवलेले आहे. हजारो दृष्टिहिनाना दृष्टि मिळवुन दिलेली आहे  . वाढ़दिवसानिमित्त डॉ . शाहू रसाळ दरवर्षी मोफत ऑपरेशन करीत आहेत . गरजवंताला मदतीचा हात देणारे  डॉ. रसाळ  यांनी आपल्या कृतीतून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. डॉ . शाहू रसाळ यांनी केवळ सामाजिक आशयाच्या कविता लिहिल्या नाहीत तर सामाजिक कार्याचा मंत्र  आपल्या कृतीतून अंगीकारलेला आहे . यावेळी बोलताना डॉ . शाहू रसाळ म्हणाले ", माझे बालपण अत्यंत खड़तर गेले . मामानी माझे शिक्षण पूर्ण केले . त्यामुळे वंचितांचे अश्रू मला माझेच वाटतात. प्रत्येकाने आपापल्या परिने सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवावा. "ठाण्यातील  हार्ट पेशंटसाठी अद्ययावत  रुग्णालय  उभारन्याचे काम जोरात सुरू असल्याचे सांगून नानजीभाई  खिमजी ठक्कर म्हणाले " , ठाण्यातील नागरिकाना  आजारपण्याच्या कोणत्याही उपचारसाठी मुलुंडची वेश ओलांडायची गरज नाही . अत्याधुनिक उपचार देणारे रुग्णालय ठाण्यात उभारले जाणार असून या रुग्णालयात हृदयरोग मोफत बरा केला जाणार आहे . डॉ. शाहू रसाळ यांच्यासारख्या सामाजिक सेवेचे व्रत घेतलेल्या सेवाभावी माणसांमुळे हे स्वप्न पुर्णत्वला जाणार आहे . " खासदार राजन विचारे यांनीही डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . नानजी खिमजी ठक्कर यांना रूग्णमित्र पुरस्कार देऊन गौरविन्यात आले . जुई प्रधान हिने काव्यसंग्रहातील काही निवडक कविता सादर करून उपस्तिथांची दाद मिळवली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर यांनी केले .' सहजीवन संगीत संध्या ' या  वाद्यवृंदातील अनेक गायक - गायिकानी विविध गाणी सादर करून  कार्यक्रमाची सुरूवात केली . डॉ. शाहु रसाळ आणि प्रीती निमकर यांनी अनेक द्वंद्वगीते सादर केली. सीकेपी हॉलमधे तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या कार्यक्रमासाठी अनेक रसिक ठाणेकर उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई