शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘फोर्ब्स’च्या यादीतील अब्जाधीशांचे सामाजिक योगदान शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:40 IST

दरवर्षी फोर्ब्स मासिक प्रसिद्ध करीत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत किमान दहा भारतीय अब्जाधीशांचा समावेश असतो

डोंबिवली : दरवर्षी फोर्ब्स मासिक प्रसिद्ध करीत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत किमान दहा भारतीय अब्जाधीशांचा समावेश असतो. मात्र भारतामधील गोरगरीबांच्या समस्या सोडवण्यात या श्रीमंतांचे काडीमात्र योगदान नाही, अशी खंत नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी व्यक्त केली.डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता सभारंभात राज्यपाल आचार्य बोलत होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाहक संजय कुलकणी, संजय हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रसाद भिडे यांनी केले.राज्यपाल आचार्य म्हणाले की, श्रीमंताच्या यादीत भारतीय श्रीमंताची नावे दरवर्षी येतात. ज्यामुळे त्यांची नावे या यादीत झळकली तो देश, ती शाळा, त्यांचा मित्र परिवार, समाज यांच्यासाठी त्यांचे काहीच योगदान नसते. श्रीमंतांची जर इतकी अनास्था असेल तर देशाची आर्थिक प्रगती कशी होणार, असा सवाल त्यांनी केला. यादीतील दहा श्रीमंतांपैकी किमान ९ जण मुंबईत राहणारे असतात. मुंबईची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. त्यापैकी ७० लाख लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांचे जीवन नरकावस्थेपेक्षा बत्तर आहे. आदिवासींच्या जीवनापेक्षाही शहरी गरीबांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांना आदिवासींप्रमाणे मोकळा आणि स्वच्छ आॅक्सिजन मिळू शकत नाही. शहरी गरीबांचे व देशातील अन्य भागातील गरीबांचे राहणीमान उंचावण्यात या श्रीमंताचे योगदान नाही. ही शोकांतिका आहे. त्याचा विचार शिक्षण संस्थांनी केला पाहिजे.शिक्षण आणि व्यवसाय, उद्योगातील संधी यांचे प्रमाण आपल्याकडे व्यस्त आहे. परिणामी आपल्याकडे बेरोजगारीची समस्या जास्त आहे. बेरोजगार पदवीधर निर्माण करुन देश कमजोर झाला की बलशाली हा खरा प्रश्न आहे. जातीपातीच्या नावावर देशाला विघटीत न करता. भारत हा जन्मत: धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे सगळ््यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.विद्यार्थी घडवत असताना तो आत्मकेंद्रीत वृत्तीचा असता कामा नये. त्याच्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे. तरच आपण खरे विद्यार्थी घडविले असे मला वाटते. शिक्षणाच्या यशाचे मापदंड चुकीचे असता कामा नये. आपल्याकडे विकासाचा रोडमॅप असला पाहिजे. रोजगार, शिक्षण आणि वीज या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या देशात ६८ टक्के युवकांचे प्रमाण आहे. तर देशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिंक साधनसंपत्ती आहे. त्याचा उपयोग करुन भारत हा महासत्ता होऊ शकतो असे आचार्य यांनी नमूद केले.राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, एक-एक व्यक्ती मिळून कुटुंब तयार होते. कुटुंब मिळून परिवार तयार होतो. परिवार मिळून देश तयार होतो. देशाच्या हिताचे काम करणे हे संघाचे व्रत आहे. विद्यार्थी घडवित असताना समाजमन विकसीत करण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण संस्थेने केले आहे.