शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गासमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: May 31, 2017 03:41 IST

गास गावात घुसलेल्या चोरट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दगड-विटांनी हल्ला केला. त्यात तीन गावकरी

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : गास गावात घुसलेल्या चोरट्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दगड-विटांनी हल्ला केला. त्यात तीन गावकरी जखमी झाले. गेल्या तीन दिवसांपासून चोरटे गावात येत असल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. शनिवार मध्यरात्रीपासून सलग तीन रात्र चोरटे गावात घुसत आहेत. पहिल्या दिवशी गावातील पाटील आळीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पहिल्यांदा चोरट्यांनी कृष्णा पाटील यांच्या मागच्या दाराला भगदाड पाडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून माल लुटण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी शेजारील तबेल्यात मालक आणि नोकर बोलत असल्याचे चोरट्यांनी ऐकले. त्यामुळे त्यांना घरातून पळ काढला. दुसऱ्या रात्री चोरटे पु्न्हा पाटील आळीत घुसले. यावेळीही एक घर फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे असफल ठरला. तिसऱ्या रात्री चोरट्यांना कुत्र्यांनी रोखून धरले. मध्यरात्री कुत्री भुंकत असल्याने चोरटे राजू नाईक यांच्या घरामागे लपून राहिले होते. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे गावकरी गावात गस्त घालत असताना त्यांना चोरटे दिसून आले. मात्र, गावकरी अंगावर येत असल्याचे पाहून चोरट्यांनी दगड, विटा, लोखंडी सळ्यांच्या साहय्याने हल्ला चढवला. हल्ल्यात चंद्रकांत पाटील, कल्पेश नाईक आणि हार्दिक नाईक जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि खांद्याला, गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील आणि आशिष जोशी यांच्यासह गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.