शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

जिल्ह्यातील शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर आता कार्डधारकाची खात्री पटवून अन्नधान्य देण्यासाठी त्यांचे ऑनलाइन थम्ब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर आता कार्डधारकाची खात्री पटवून अन्नधान्य देण्यासाठी त्यांचे ऑनलाइन थम्ब घेतले जात आहेत. त्यामुळे योग्य व मूळ कार्डधारकालाच अन्नधान्य मिळाल्याची खात्री होत आहे. जिल्ह्यातील या रास्त भाव दुकानांवरील अन्नधान्य पुरवठा सुरळीत व योग्य दर्जाचा होत असल्याचे आढळले. मात्र, मुरबाड तालुक्यातील शेतकरी सहकारी संघाच्या रेशनिंग दुकांनावरील अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा वापर थेट पोल्ट्री फार्मसाठी केला जात असल्याचे आढळले आहे.

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण आदी दोन विभागांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या शिधावाटप विभागाकडून अन्नधान्याचा पुरवठा रास्त भाव दुकानांना केला जात आहे. कोरोना महामारीच्या संचारबंदीत या दुकानांमधील अन्न धान्य पुरवठ्यावर नागरिकांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य झाले. जिल्ह्याच्या शहरी भागात सात लाख १७ हजार ४८ हजार या अंत्योदय कार्डधारकांना दरमहा ३५ किलो अन्नधान्याचे वितरण होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गहूऐवजी तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरत आहे. यामुळे या ३५ किलो अन्नधान्यामध्ये २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू या अंत्योदय कार्डधारकास वितरण केले जात आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलोने या ग्राहकांकडून गव्हाची खरेदी केली जात आहे. या प्रमाणेच प्राधान्यक्रमाच्या कार्डधारकांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे. यामध्ये तीन रुपये दराने तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू प्रति किलो दोन रुपये दराने वितरण केले जात आहे. या पाहणीमध्ये बहुतांशी शिधावाटप विभागाच्या रास्त भाव दुकानांवर चांगल्या दर्जाचे अन्नधान्य वाटप केले जात आहे. त्यामुळे अंत्याेदय व प्राधान्यक्रम कार्डधारकांकडून त्यांचा लाभ घेतला जात आहे.

..........