शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अडीचपर्यंत धुमसत होती आग

By admin | Updated: April 13, 2016 02:18 IST

नागाव कासीमपूरा येथील ‘राहत मंजील’ या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामास लागलेली भीषण आग दुपारी अडीच वाजेपर्यंत धुमसत होती.

भिवंडी : नागाव कासीमपूरा येथील ‘राहत मंजील’ या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामास लागलेली भीषण आग दुपारी अडीच वाजेपर्यंत धुमसत होती. सकाळी साडेसहा वाजता शॉर्ट सर्कीटमुळे गोदामाला आग लागली, अशी अग्निशमन दलाची प्राथमिक माहिती आहे. तेथील कापड व धाग्याने क्षणार्धात पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा व धुराच्या लोटांनी इमारतीला लपेटले. वरील फ्लॅटमध्ये झोपलेले किंवा नुकतेच जागे झालेले सुमारे दीडशे रहिवासी धुराचा त्रास होऊ लागल्याने व आगीचे तांडव पाहून भयभीत झाल्याने इमारतीच्या गच्चीवर जाऊन उभे होते. एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये येण्या-जाण्याकरिता केवळ एकच जिना होता. त्यावर धुराचे साम्राज्य पसरलेले असल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. आग लागल्यानंतर तब्बल एक तासांनी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आग विझवण्याकरिता भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे इतकेच नव्हे तर मुंबईतून अग्निशमन दलाच्या गाड्यांची कुमक मागवण्यात आली. अग्निशामन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून दुपारी १२ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आगीचे स्वरुप भीषण होते. मात्र अग्निशमन दलाने केलेल्या कामगिरीमुळे प्राणहानी झाली नाही. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे, मनपा आयुक्त बालाजी खतगावकर,तहसीलदार वैशाली लंभाते व पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे हे हजर होते. (प्रतिनिधी)सहा जण जखमीइमारती शेजारील पत्र्याच्या शेडवर उभे राहून पहिल्या मजल्यावर पाणी मारणारा इश्तेहाक अन्सारी कोसळल्याने त्याच्या पाय -कानाला मार लागून जखमी झाला. गोविंद खांडकर बचावकार्य करताना ज्वाळांची धग लागल्याने तर रहिवासी शकील अन्सारी हे शॉक लागल्याने जखमी झाले. कांतीलाल गुजर हे मदतकार्य करताना पोटात दुखू लागल्याने इस्पितळात दाखल झाले.यासीन अन्सारी व सय्यद हाफिज रेहमान कादरी हे रहिवासी आग लागल्यावर इमारतीमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत जखमी झाले.आगीचे विधानसभेत पडसादशहरांतील कासीमपूरा भागात लागलेल्या आगीचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. भिवंडी शहराबाहेरून आणलेल्या पाण्याने ही आग विझविली जात असल्याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी खेद व्यक्त केला. विधानसभेत या आगीकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधून शहरांत आधुनिक अग्निशामक केंद्र उभारण्याची मागणी केली.स्थानिक अग्निशामक दलाकडे आग विझविण्याची योग्य साधने नसल्याने वेळीच ती विझली नाही. तसेच ती विझविण्यासाठी ठाणे व कल्याण येथून पाणी भरलेले बंब बोलविण्यात आले. शहरांत पॉवरलूम व विविध इंडस्ट्रीज आहेत. अशा स्थितीत अत्याधुनिक अग्निशामक केंद्राची उभारणी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. भिवंडीतील लोकसंख्या व लोकवस्ती जलदगतीने वाढत आहे. त्यानुसार नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. निधी उपलब्ध नसल्याने मनपा निष्क्रिय झाली आहे. त्यामुळे भिवंडी महानगरपालिका तत्काळ बरखास्त झाली पाहिजे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली.अग्निशामकदल या ठिकाणी उशिरा आले. टँकरद्वारे पाणी आणून आग विझवित होते. परंतु, आमचे कुटूंब व शेजारी सर्व घाबरलेले होते. तोपर्यंत धुराने इमारतीस वेढले होते. आम्हाला माणसे दिसत नव्हती. तेंव्हा टेरेसवरून वाचविण्यासाठी गोंगाट केला. मोहल्यातील सर्वजणांनी धावून मदत केली.सईद अन्सारी, भाडोत्रीया इमारतीत मी गेल्या दोन वर्षापासून भाड्याने राहतो. सकाळी सात वाजता कारखान्यात जाताना जीना उतरत असताना जीना धूराने भरलेला दिसला. तेव्हा घाबरून घरातल्यांना आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर मिळेल त्या मार्गाने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. आग विझेपर्यंत कुंटुंबास नातेवाईकांकडे पाठविले. -तौहीद अहमद अन्सारी, पॉवरलूम कामगार