शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

अडीचपर्यंत धुमसत होती आग

By admin | Updated: April 13, 2016 02:18 IST

नागाव कासीमपूरा येथील ‘राहत मंजील’ या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामास लागलेली भीषण आग दुपारी अडीच वाजेपर्यंत धुमसत होती.

भिवंडी : नागाव कासीमपूरा येथील ‘राहत मंजील’ या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गोदामास लागलेली भीषण आग दुपारी अडीच वाजेपर्यंत धुमसत होती. सकाळी साडेसहा वाजता शॉर्ट सर्कीटमुळे गोदामाला आग लागली, अशी अग्निशमन दलाची प्राथमिक माहिती आहे. तेथील कापड व धाग्याने क्षणार्धात पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा व धुराच्या लोटांनी इमारतीला लपेटले. वरील फ्लॅटमध्ये झोपलेले किंवा नुकतेच जागे झालेले सुमारे दीडशे रहिवासी धुराचा त्रास होऊ लागल्याने व आगीचे तांडव पाहून भयभीत झाल्याने इमारतीच्या गच्चीवर जाऊन उभे होते. एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये येण्या-जाण्याकरिता केवळ एकच जिना होता. त्यावर धुराचे साम्राज्य पसरलेले असल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. आग लागल्यानंतर तब्बल एक तासांनी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आग विझवण्याकरिता भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे इतकेच नव्हे तर मुंबईतून अग्निशमन दलाच्या गाड्यांची कुमक मागवण्यात आली. अग्निशामन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून दुपारी १२ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. आगीचे स्वरुप भीषण होते. मात्र अग्निशमन दलाने केलेल्या कामगिरीमुळे प्राणहानी झाली नाही. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संतोष थिटे, मनपा आयुक्त बालाजी खतगावकर,तहसीलदार वैशाली लंभाते व पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे हे हजर होते. (प्रतिनिधी)सहा जण जखमीइमारती शेजारील पत्र्याच्या शेडवर उभे राहून पहिल्या मजल्यावर पाणी मारणारा इश्तेहाक अन्सारी कोसळल्याने त्याच्या पाय -कानाला मार लागून जखमी झाला. गोविंद खांडकर बचावकार्य करताना ज्वाळांची धग लागल्याने तर रहिवासी शकील अन्सारी हे शॉक लागल्याने जखमी झाले. कांतीलाल गुजर हे मदतकार्य करताना पोटात दुखू लागल्याने इस्पितळात दाखल झाले.यासीन अन्सारी व सय्यद हाफिज रेहमान कादरी हे रहिवासी आग लागल्यावर इमारतीमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत जखमी झाले.आगीचे विधानसभेत पडसादशहरांतील कासीमपूरा भागात लागलेल्या आगीचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. भिवंडी शहराबाहेरून आणलेल्या पाण्याने ही आग विझविली जात असल्याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी खेद व्यक्त केला. विधानसभेत या आगीकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधून शहरांत आधुनिक अग्निशामक केंद्र उभारण्याची मागणी केली.स्थानिक अग्निशामक दलाकडे आग विझविण्याची योग्य साधने नसल्याने वेळीच ती विझली नाही. तसेच ती विझविण्यासाठी ठाणे व कल्याण येथून पाणी भरलेले बंब बोलविण्यात आले. शहरांत पॉवरलूम व विविध इंडस्ट्रीज आहेत. अशा स्थितीत अत्याधुनिक अग्निशामक केंद्राची उभारणी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. भिवंडीतील लोकसंख्या व लोकवस्ती जलदगतीने वाढत आहे. त्यानुसार नागरी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. निधी उपलब्ध नसल्याने मनपा निष्क्रिय झाली आहे. त्यामुळे भिवंडी महानगरपालिका तत्काळ बरखास्त झाली पाहिजे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली.अग्निशामकदल या ठिकाणी उशिरा आले. टँकरद्वारे पाणी आणून आग विझवित होते. परंतु, आमचे कुटूंब व शेजारी सर्व घाबरलेले होते. तोपर्यंत धुराने इमारतीस वेढले होते. आम्हाला माणसे दिसत नव्हती. तेंव्हा टेरेसवरून वाचविण्यासाठी गोंगाट केला. मोहल्यातील सर्वजणांनी धावून मदत केली.सईद अन्सारी, भाडोत्रीया इमारतीत मी गेल्या दोन वर्षापासून भाड्याने राहतो. सकाळी सात वाजता कारखान्यात जाताना जीना उतरत असताना जीना धूराने भरलेला दिसला. तेव्हा घाबरून घरातल्यांना आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर मिळेल त्या मार्गाने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. आग विझेपर्यंत कुंटुंबास नातेवाईकांकडे पाठविले. -तौहीद अहमद अन्सारी, पॉवरलूम कामगार