शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

स्मार्ट सिटीचे प्रकल्प कूर्मगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 23:50 IST

ठाणेकरांना शहर स्मार्ट झाल्याचे कुठेही दिसलेले नाही. केवळ महापालिकेचे प्रकल्प बैठकीत व कागदावरच स्मार्ट असल्याचे दिसत आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, खरंच केंद्र आणि राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा विनियोग योग्य कामासाठी झाला आहे का, असा जाब आता ठाणेकरांनी विचारण्याची वेळ आली आहे.

- अजित मांडकेठाणे महापालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता निवड झाल्यानंतर या शहरासाठी तब्बल ४२ प्रकल्प हाती घेण्यात आले. त्यासाठी ५४८० कोटी ७० लाख रुपयांचा प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला. त्यानुसार ३५ प्रकल्प स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत घेण्यात आले असून त्यातील १५ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेच्या स्मार्ट सिटी लि. कंपनीने केला आहे. यासाठी ५२.४० कोटींचा खर्च करण्यात आला असून पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये अर्बन रेस्ट रुमचा अधिकचा समावेश आहे. मात्र क्लस्टर, नवीन रेल्वेस्थानक, ठाणे पूर्वेचा सॅटिस, वॉटरफ्रंट आदी प्रकल्प वगळता इतर प्रकल्प हे एक वर्षापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प हे वर्कआॅर्डर देण्यासह, निविदा मंजुरीच्या प्रक्रियेत अडकले आहेत. त्यामुळे ठाणे शहर कधी स्मार्ट होणार? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ५४८० कोटी ७० लाखांचा स्मार्ट सिटी जम्बो आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये ४२ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. महापालिकेची २५ जून २०१६ ला स्मार्ट सिटीसाठी निवड झाली. त्यानंतर पालिकेला स्मार्ट सिटीअंतर्गत टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य शासन आणि महापालिकेचा असा मिळून ४९४ कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झालेला आहे. परंतु पहिल्या टप्प्यात आलेला निधी तीन ते चार महिने पडून होता. त्यावरून राज्य शासनाने पालिका प्रशासनाचे कान टोचले होते. त्यानंतर पालिकेने त्यांच्या माध्यमातून करण्यात येत असलेले प्रकल्प स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट केले. मात्र त्यानंतरही स्मार्ट सिटीच्या उभारणीसाठी मिळालेल्या निधीतून अर्बन रेस्ट रुमवगळता इतर महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वास आले नाहीत. काही कामांच्या वर्कआॅर्डर दिल्या असल्या तरी त्याचे काम हे जेमतेम एक ते दोन टक्केच झाले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात ठाणे स्टेशन परिसरातील एक हजार एकर क्षेत्रफळाचा कायापालट केला जाणार आहे. त्यामध्ये मासुंदा आणि कचराळी या तलावांचा समावेश आहे. या परिसरात एलईडी लाइट बसवणे, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, बहुमजली पार्किंग सुविधा, पूर्वेतील सॅटिस, सॉफ्ट मोबिलिटीमध्ये पादचारी आणि सायकलसाठी वेगळी लेन, सॉलीड वेस्ट आणि सिव्हरेज वेस्टसाठी डिसेंट्रलाइज प्लान्ट, सोलर एनर्जी, वॉटर मीटरिंग, आदी सुविधांसह इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नव्या रेल्वेस्टेशनचा विकास या माध्यमातून केला जाणार आहे. तीनहातनाक्याजवळील सिग्नल यंत्रणेत बदल, क्लस्टर डेव्हलपमेंट आदींचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला ४२ पैकी ३५ प्रकल्प हे स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सुरू असून त्याचा खर्च हा ११७ कोटी ४५ लाख एवढा आहे. सद्य:स्थितीत १५ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यावरील खर्चाची रक्कम ५२ कोटी ४० लाख एवढी आहे. अन्य २३ प्रकल्पांचे कामकाज प्रगतीपथावर असून त्यांची रक्कम १२०१ कोटी ३० लाख इतकी आहे, तर चार प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरू होणे शिल्लक असून त्याची रक्कम ही तब्बल ४२२७ कोटी आहे. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत १५ प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी यामध्ये १० अर्बन रेस्टरुमचा समावेश आहे. त्यातही काही योजनांची कामे ही काही टक्के झाली असतानाही ठेकेदारांना मात्र बिले अदा करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही व वायफायचे काम ४८ टक्के पूर्ण झाले असताना त्या ठेकेदाराला ४२ पैकी ३४ कोटी अदा केले, डीजी ठाण्यावर २२ कोटी ७६ लाखांचा खर्च करण्यात आला.दरम्यान, यातील १५ प्रकल्प सोडले तर उर्वरित २० प्रकल्पांचा गाडा अद्यापही चिखलात रुतलेल्या अवस्थेत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जे प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा पालिका करीत आहे, ते प्रकल्पही धूळखात पडून आहेत. त्याचा लाभ अद्यापही कोणाला घेता आलेला नाही. त्यामुळे आलेला निधी कशाही पद्धतीने खर्च करून राज्य शासनाकडून पुन्हा बोलणी न खाण्यासाठी पालिकेची धडपड सुरू असल्याचेच दिसून आले आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी