शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

स्मार्ट सिटीला तुटपुंज्या तरतुदीचा फटका

By admin | Updated: November 13, 2016 01:03 IST

ठाणे शहराचा स्मार्ट सिटीचा आराखडा सहा हजार ८४८ कोटी ४५ लाख रुपयांचा असताना या महापालिकेला आतापर्यंत केवळ एक कोटी रुपये, तर कल्याण-डोंबिवलीचा आराखडा एक हजार

कोल्हापूर : काळ्या पैशाच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुसती स्टंटबाजी सुरू आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही मोदींकडून स्टंट शिकावेत, अशी बोचरी टीका सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)चे राष्ट्रीय सचिव स्वदेश देवरॉय यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. केंद्र सरकार येत्या संसदीय अधिवेशनामध्ये कामगारविरोधी विधेयक आणणार आहे. त्याला कडाडून विरोध करून ते हाणू पाडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यावेळी स्वदेश देवरॉय म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयाचा काळ्या पैशाशी काहीच संबंध नाही. याप्रश्नी मोदींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. यात त्यांचा स्वार्थ दिसत असून, सर्वसामान्यांना मात्र याचा त्रास होत आहे. काळा पैसा हा सोने, रियल इस्टेट, सिनेमा, आदी क्षेत्रांतील गुंतवणुकीत असतो, तो काही ५०० व १०००च्या नोटांमध्ये नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे कामगारविरोधी आहे. मोदी हे कामगार कायदा संपवून मालकांच्या बाजूने येणाऱ्या संसदीय अधिवेशनामध्ये विधेयक आणणार असून, ते कामगारविरोधी आहे. विधेयक आणण्याची त्यांनी पूर्ण तयारी केली आहे; परंतु ते विधेयक हाणून पाडण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. एका बाजूला काळ्या पैशाबद्दल बोलता आणि दुसऱ्या बाजूला कामगारांचे पैसे घेऊन मालकांचे भले करता हा सरकारचा विरोधाभास दिसत आहे.बांधकाम कामगारांच्या मागण्यांसंदर्भात कोल्हापुरात राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक घेतली जात आहे. यामध्ये कामगारांच्या मागण्यांसाठी व कामगार कायद्याच्या विरोधातील भूमिकेबद्दल सरकारविरोधात लढण्याकरिता कृती आराखडा (अ‍ॅक्शन प्लॅन) जाहीर केला जाणार आहे. येत्या अधिवेशनामध्ये दिल्लीत आंदोलन केले जाणार असून, आमच्याबरोबर शिवसेनेसह भारतीय मजदूर संघ, आयटक, आदी कामगार संघटनांही सहभागी होणार आहेत.यावेळी एम. एस. शेख, चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, प्रा. आबासाहेब चौगुले, शिवाजीराव मोरे, आदी उपस्थित होते.सरकारकडून माध्यमांंचा आवाज दाबण्याचा प्रयत्नहे सरकार प्रसिद्धीमाध्यमांचा आवाज दाबत आहे. एनडीटीव्हीच्या प्रक्षेपणावर काही दिवस बंदी घालून त्यांना नियंत्रणात आणण्याचा घाट घालत आहे. यामुळे परिस्थिती आणीबाणीसारखीच निर्माण झाली आहे, असे देवरॉय यांनी सांगितले.