शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांना डावलून स्मार्ट सिटीची घाई

By admin | Updated: December 16, 2015 00:36 IST

ठाण्याचा स्मार्ट सिटीच्या ५५५० कोटींच्या आराखड्यात काही बदल करुन ६६३० कोटींचा सुधारित अंतिम आराखडा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी केंद्र सरकारला

ठाणे : ठाण्याचा स्मार्ट सिटीच्या ५५५० कोटींच्या आराखड्यात काही बदल करुन ६६३० कोटींचा सुधारित अंतिम आराखडा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी केंद्र सरकारला सादर केला. आराखडा मांडण्यासाठी जाताना महारौपांना सोबत न नेल्याने आणि सत्ताधाऱ्यांना विश्वासात न घेता तब्बल एक हजार कोटींनी आराखडा फुगविल्याने शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. भविष्यातील ठाणे शहर कसे असेल, या संदर्भात पालिकेने केलेल्या जनजागृतीेनंतर ठाणेकरांनी केलेल्या सूचनांनुसार, सर्वसमावेशक असा स्मार्ट सिटीचा ५५५० कोटींची आराखडा पालिका आयुक्तांनी तयार केला होता. आता त्यात काही बदल सुचवण्यात आले असून आणखी काही प्रयोग केले जाणार आहेत. त्यामुळे आराखड्याचे आकारमान वाढले असून तो ६६३० कोटींवर गेल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तो अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे सादर झाला आहे. हा आराखडा केंद्र सरकारला सादर करण्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी केंद्रीय नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांच्यापुढे त्याचे सादरीकरण केले आणि त्यांना महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेने सादर केलेल्या या आराखड्याविषयी अतिरिक्त सचिवांनीही समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांच्या सोबत अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महापौर नाराज, शिवसेनेत अस्वस्थता ठाण्यातील स्मार्ट सिटीच्या आराखड्यावरून आधीच भाजप विरोधात शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. दीड वर्षांत होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आराखड्याचा फायदा उठवण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. स्मार्ट शहराच्या प्रश्नावलीवरून आधीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे पालिका प्रशासनाची खिल्ली उडवनली होती. ठाणेकरांनी मांडलेले प्रश्न आणि सुधारित आराखड्यात मांडलेले मुद्दे याबाबत सत्ताधारी शिवसेनेत नाराजी आहे. त्याबाबत आणि दिल्लीत होणाऱ्या सादरीकरणावेळी न नेल्याने महापौर नाराज आहेत, अशी चर्चा दिवसभर पालिका वर्तुळात होती, पण महापौर संजय मोरे यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांना विश्वासात न घेता आराखडा हजार कोटींनी फुगविल्याबद्दल मात्र अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.पीपीपीला महत्त्वपालिकेतील स्थायी समितीला विश्वासात न घेता सर्व महत्त्वाच्या कंत्राटांचे कंपनीकरण होईल, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांत आहे. त्यावर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी स्टँडिंगमधील अंडरस्ँडिंग संपेल, अशी भावना व्यक्त केली होती. ती नाराजी कायम असतानाच, पीपीपी मॉडेलवर आयुक्तांनी भर दिल्याने आपल्या हाती काहीच अधिकार राहणार नाही, अशी नगरसेवकांची नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही भावना झाली आहे.