शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

टंचाईच्या ‘स्लाइड शो’ने डोळ्यांत पाणी

By admin | Updated: April 20, 2016 02:02 IST

सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळाची ही भयानक परिस्थिती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याची कथा स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली

ठाणे : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळाची ही भयानक परिस्थिती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याची कथा स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली. २०१३ सालच्या भीषण दुष्काळाच्या चित्रफितीने ठाणेकरांच्या डोळ्यांत पाणी आले. फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने २०१० पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा रविवारी ७५ वा शो पार पडला. या वेळी ‘पाणी दी स्टोरी आॅफ वॉटर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २०१३ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळग्रस्त भागांत जाऊन वरिष्ठ छायाचित्रकार संजय नाईक, प्रवीण देशपांडे यांनी दुष्काळाची भीषण दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती. या वेळी भाजपाच्या अ‍ॅड. माधवी नाईकदेखील त्यांच्यासह होत्या. १० दिवसांत १० जिल्ह्यांचा प्रवास त्यांनी केला होता. सध्या महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ पाहता २०१३ सालचा दुष्काळाचा प्रवास स्लाइड शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला. २० मिनिटांत चार वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाचे चित्रण पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. या स्लाइड शोमधल्या एका प्रसंगाने थक्क झाले, तो प्रसंग होता बुलडाणा जिल्ह्यातील देऊळराजा या गावातला. २९ दिवसांनी एकदा पाणी येते, तेही एक तास. टँकरचे पाणी आले की महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक कशा प्रकारे धावतात, या प्रसंगाने हेलावून टाकले. जी २०१३ साली परिस्थिती होती, ती आजही महाराष्ट्रात आहे. शहरांमध्येही दुष्काळाची झळ पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणी वाचवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हेच या वरिष्ठ छायाचित्रकारांनी सांगितले. या वेळी त्यांनी या प्रवासादरम्यान आलेले अनुभवकथन केले. या वेळी अ‍ॅड. नाईक यादेखील उपस्थित होत्या. आजही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत जपून वापरवे व पाणी वाचवावे, असा संदेश त्यांनी दिला. काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतून सरकारने जी कामे केली, त्यातून परिस्थिती बदलली असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)