शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

पत्रीपुलावर सहा तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:29 IST

एसटी बस बंद पडल्याने फटका । वाहनचालक, प्रवाशांचे झाले हाल

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडल्याने त्यावरील वाहतूक शेजारील पुलावरून वळवण्यात आली आहे. मात्र, हा पूल अरुंद असल्याने तेथे नेहमी वाहतूककोंडी होते. त्यातच, शनिवारी नेमकी पुलावरच शीळहून कल्याणकडे येणारी एसटी बस बंद पडली. त्यामुळे या पुलावर सहा तास वाहतूककोंडी झाल्याने त्याचा मोठा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसला.

कल्याणच्या पत्रीपुलावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पूल पाडून तेथे नवीन पूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र, या कामाला गती नाही. तर, शेजारील अरुंद पुलावर प्लास्टिकचे दुभाजक ठेवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा ताण येत आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता पुलावरून जाणारी एसटी बस तांत्रिक बिघाडामुळे तेथेच बंद पडली. परिणामी, वाहतूककोंडीत आणखी भर पडली.एसटी बसचालक व वाहक यांनी बस बंद पडल्याची माहिती कल्याण एसटी डेपोला दिली. मात्र, सायंकाळी ५ वाजले तरी बंद पडलेली बस तेथून हलवलेली नव्हती. त्यामुळे बसचालक आणि वाहक हतबल झाले. शिवाय, वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांनीही टोइंग व्हॅन मागवली नाही. त्यामुळे अन्य वाहनचालकांनी त्यांच्या नावाने शंख केला. दरम्यान, एसटी बसमधील प्रवाशांनाही पत्रीपुलावरून कल्याण रेल्वे स्थानक गाठण्यासाठी भरउन्हात पायपीट करावी लागली.खड्डे आणि प्लास्टिकचे तुटलेले दुभाजकजुन्या पत्रीपुलाला समांतर असलेल्या पुलाच्या सुरुवातीला काही ठिकाणी खड्डे आहेत. तसेच प्लास्टिकचे दुभाजक बेशिस्त वाहनचालकांमुळे तुटले आहे. दुभाजकाची लेनही विस्कटली आहे.च्पुलावरील खड्डे भरणे, दुभाजक नव्याने लावणे, याकडे वाहतूक नियंत्रण शाखा, महापालिका व राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. हद्दीचा मुद्दा न पाळता महापालिकेकडून खड्डे बुजवले जाणार होते. तसेच पुलावर मास्टिक अस्फाल्टिंग शीट टाकली जाणार होती. मात्र, ती टाकण्यात आलेली नाही.च्महापालिकेच्या मते राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या ताब्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास १ मे पासूनच सुरुवात केली आहे. मग, या पुलावरील खड्डे का बुजवले गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.