शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपुलावर सहा तास वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:29 IST

एसटी बस बंद पडल्याने फटका । वाहनचालक, प्रवाशांचे झाले हाल

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडल्याने त्यावरील वाहतूक शेजारील पुलावरून वळवण्यात आली आहे. मात्र, हा पूल अरुंद असल्याने तेथे नेहमी वाहतूककोंडी होते. त्यातच, शनिवारी नेमकी पुलावरच शीळहून कल्याणकडे येणारी एसटी बस बंद पडली. त्यामुळे या पुलावर सहा तास वाहतूककोंडी झाल्याने त्याचा मोठा फटका वाहनचालक आणि प्रवाशांना बसला.

कल्याणच्या पत्रीपुलावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत. कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा जुना पूल पाडून तेथे नवीन पूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मात्र, या कामाला गती नाही. तर, शेजारील अरुंद पुलावर प्लास्टिकचे दुभाजक ठेवून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा ताण येत आहे.

शनिवारी सकाळी ११ वाजता पुलावरून जाणारी एसटी बस तांत्रिक बिघाडामुळे तेथेच बंद पडली. परिणामी, वाहतूककोंडीत आणखी भर पडली.एसटी बसचालक व वाहक यांनी बस बंद पडल्याची माहिती कल्याण एसटी डेपोला दिली. मात्र, सायंकाळी ५ वाजले तरी बंद पडलेली बस तेथून हलवलेली नव्हती. त्यामुळे बसचालक आणि वाहक हतबल झाले. शिवाय, वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांनीही टोइंग व्हॅन मागवली नाही. त्यामुळे अन्य वाहनचालकांनी त्यांच्या नावाने शंख केला. दरम्यान, एसटी बसमधील प्रवाशांनाही पत्रीपुलावरून कल्याण रेल्वे स्थानक गाठण्यासाठी भरउन्हात पायपीट करावी लागली.खड्डे आणि प्लास्टिकचे तुटलेले दुभाजकजुन्या पत्रीपुलाला समांतर असलेल्या पुलाच्या सुरुवातीला काही ठिकाणी खड्डे आहेत. तसेच प्लास्टिकचे दुभाजक बेशिस्त वाहनचालकांमुळे तुटले आहे. दुभाजकाची लेनही विस्कटली आहे.च्पुलावरील खड्डे भरणे, दुभाजक नव्याने लावणे, याकडे वाहतूक नियंत्रण शाखा, महापालिका व राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. हद्दीचा मुद्दा न पाळता महापालिकेकडून खड्डे बुजवले जाणार होते. तसेच पुलावर मास्टिक अस्फाल्टिंग शीट टाकली जाणार होती. मात्र, ती टाकण्यात आलेली नाही.च्महापालिकेच्या मते राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या ताब्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास १ मे पासूनच सुरुवात केली आहे. मग, या पुलावरील खड्डे का बुजवले गेले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.