शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कोरोनामुळे साडेसहा हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशाला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरटीईच्या २५ ...

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरटीईच्या २५ टक्के शाळा प्रवेशालादेखील त्याचा फटका बसला आहे. यंदाच्या वर्षीसाठी ९ हजार ८८ अर्जांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश निश्चित केल्याची बाब समोर आली आहे.

वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे. त्यांनी संबंधित शाळेत जाऊन ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. त्यात ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपांमधील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ जी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार ८८ अर्जांची निवड झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील शाळा प्रवेशाची मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत केवळ दोन हजार ५३८ विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश घेतल्याची बाब समोर आली असून, तब्बल सहा हजार ५४८ जणांनी प्रवेश घेतले नसल्याचे दिसून आले.

- शाळांनी पालकांना संदेश पोहोचवले नाहीत

जिल्ह्यातील अनेक शाळा प्रशासनाकडून निवड झालेल्या पालकांना शाळा प्रवेशाबाबतचे संदेशच न पोहोचल्यामुळे जिल्ह्यात शाळा प्रवेश न झालेल्या अर्जांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

.............

साडेसहा हजार विद्यार्थी ही संख्या खूप मोठी असून, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा प्रवेश न होणे ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील गोरगरीब साडेसहा हजार कुटुंबांना याची झळ पोहोचणार आहे. यामुळे आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशाची मुदत वाढवून देऊन या कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.