शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

कोरोनामुळे साडेसहा हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशाला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरटीईच्या २५ ...

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरटीईच्या २५ टक्के शाळा प्रवेशालादेखील त्याचा फटका बसला आहे. यंदाच्या वर्षीसाठी ९ हजार ८८ अर्जांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश निश्चित केल्याची बाब समोर आली आहे.

वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे. त्यांनी संबंधित शाळेत जाऊन ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. त्यात ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपांमधील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ जी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार ८८ अर्जांची निवड झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील शाळा प्रवेशाची मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत केवळ दोन हजार ५३८ विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश घेतल्याची बाब समोर आली असून, तब्बल सहा हजार ५४८ जणांनी प्रवेश घेतले नसल्याचे दिसून आले.

- शाळांनी पालकांना संदेश पोहोचवले नाहीत

जिल्ह्यातील अनेक शाळा प्रशासनाकडून निवड झालेल्या पालकांना शाळा प्रवेशाबाबतचे संदेशच न पोहोचल्यामुळे जिल्ह्यात शाळा प्रवेश न झालेल्या अर्जांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

.............

साडेसहा हजार विद्यार्थी ही संख्या खूप मोठी असून, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा प्रवेश न होणे ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील गोरगरीब साडेसहा हजार कुटुंबांना याची झळ पोहोचणार आहे. यामुळे आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशाची मुदत वाढवून देऊन या कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.