शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

कोरोनामुळे साडेसहा हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशाला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:27 IST

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरटीईच्या २५ ...

ठाणे : मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आरटीईच्या २५ टक्के शाळा प्रवेशालादेखील त्याचा फटका बसला आहे. यंदाच्या वर्षीसाठी ९ हजार ८८ अर्जांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश निश्चित केल्याची बाब समोर आली आहे.

वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे, यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के शिक्षणाचा हक्क अर्थात आरटीईअंतर्गत मोफत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे. त्यांनी संबंधित शाळेत जाऊन ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. त्यात ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपांमधील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ जी लॉटरीची प्रक्रिया राज्य स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील नऊ हजार ८८ अर्जांची निवड झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील शाळा प्रवेशाची मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत केवळ दोन हजार ५३८ विद्यार्थ्यांनीच शाळा प्रवेश घेतल्याची बाब समोर आली असून, तब्बल सहा हजार ५४८ जणांनी प्रवेश घेतले नसल्याचे दिसून आले.

- शाळांनी पालकांना संदेश पोहोचवले नाहीत

जिल्ह्यातील अनेक शाळा प्रशासनाकडून निवड झालेल्या पालकांना शाळा प्रवेशाबाबतचे संदेशच न पोहोचल्यामुळे जिल्ह्यात शाळा प्रवेश न झालेल्या अर्जांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

.............

साडेसहा हजार विद्यार्थी ही संख्या खूप मोठी असून, कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात शाळा प्रवेश न होणे ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील गोरगरीब साडेसहा हजार कुटुंबांना याची झळ पोहोचणार आहे. यामुळे आरटीईअंतर्गत शाळा प्रवेशाची मुदत वाढवून देऊन या कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.