शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

पालघर-डहाणूत परिस्थिती सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:58 IST

प्रशासन सज्ज : चक्रीवादळाचा संभाव्य इशारा; निवारा केंद्रात पाठविलेले नागरिक घरी परतले

अनिरुद्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणूत चक्रीवादळाचा संभाव्य धोका प्रशासनाकडून देण्यात आला असला तरी बुधवारी सायंकाळपर्यंत परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात पाठविण्यात आलेले किनारी भागातील नागरिक घराकडे परतले. दरम्यान, एनडीआरएफ टीम, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यासह तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

तालुक्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा दिल्यानंतर १ जूनपासून एक अधिकारी आणि २१ जवानांसह एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी तत्काळ चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या १३ गावांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या गावांमध्ये भेटी देऊन तेथील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली. या वेळी त्या - त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दवंडी देत ज्या नागरिकांची कच्ची घरे आहेत, त्यांना नजीकच्या शाळांमध्ये तयार केलेल्या निवारा केंद्रांत जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी नरपड, आगर, पारनाका नजीकच्या सतीपाडा वस्तीतील नागरिकांना निवारा केंद्रांत हलविले.

बुधवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत वादळसदृश स्थिती होती. साडेबारा वाजल्यानंतर कमी वेगाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. मात्र, सायंकाळी परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रांतील नागरिकांनी घर गाठले. वीजपुरवठाही अखंडित सुरू होता. डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्गालगत धोकादायक वृक्ष छाटण्याचे काम वन विभागाने हाती घेतले होते. प्रशासनाचे अधिकारी किनाºयालगतच्या गावांमध्ये राहून परिस्थितीवर नजर ठेवून होते. सायंकाळपर्यंत तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून वाºयाचा वेगही सामान्य होता, असे ते म्हणाले.जिल्हा प्रशासनाला नगरपालिका क्षेत्रासह किनाºयालगतच्या १३ गावांची संभाव्य माहिती देण्यात आली होती. त्यांच्याकडून डहाणू, नरपड आणि चिखले या गावांना संभाव्य धोका सांगण्यात आला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता डहाणू शहरातील सर्व दुकाने, कारखाने बंद करण्यात आले होते.आगरच्या दुबळापाडा या किनाºयालगत वस्तीतील कच्च्या घरांत राहणाºया शंभर नागरिकांना नजीकच्या बंगल्यात आणि वसतिगृहात हलविण्यात आले. मात्र परिस्थिती सामान्य असल्याने ते पुन्हा घराकडे परतले.- संजय पाटील/संदेश पाटील (निवारा केंद्रात मदत करणारे)तालुक्याला चक्रीवादळाचा संभाव्य इशारा देण्यात आला असला, तरी दिवसभर परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात गेलेले नागरिक घराकडे परतले असून दिवसभर कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक हालचालींवर प्रशासनाचे लक्ष असून ते सज्ज आहेत.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू