शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पालघर-डहाणूत परिस्थिती सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:58 IST

प्रशासन सज्ज : चक्रीवादळाचा संभाव्य इशारा; निवारा केंद्रात पाठविलेले नागरिक घरी परतले

अनिरुद्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणूत चक्रीवादळाचा संभाव्य धोका प्रशासनाकडून देण्यात आला असला तरी बुधवारी सायंकाळपर्यंत परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात पाठविण्यात आलेले किनारी भागातील नागरिक घराकडे परतले. दरम्यान, एनडीआरएफ टीम, महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यासह तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

तालुक्यात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा दिल्यानंतर १ जूनपासून एक अधिकारी आणि २१ जवानांसह एनडीआरएफचे पथक दाखल झाले. त्यांनी तत्काळ चिंचणीपासून बोर्डीपर्यंतच्या १३ गावांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या गावांमध्ये भेटी देऊन तेथील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी आणि उपाययोजनांविषयी माहिती दिली. या वेळी त्या - त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दवंडी देत ज्या नागरिकांची कच्ची घरे आहेत, त्यांना नजीकच्या शाळांमध्ये तयार केलेल्या निवारा केंद्रांत जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी नरपड, आगर, पारनाका नजीकच्या सतीपाडा वस्तीतील नागरिकांना निवारा केंद्रांत हलविले.

बुधवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत वादळसदृश स्थिती होती. साडेबारा वाजल्यानंतर कमी वेगाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. मात्र, सायंकाळी परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रांतील नागरिकांनी घर गाठले. वीजपुरवठाही अखंडित सुरू होता. डहाणू - बोर्डी प्रमुख राज्यमार्गालगत धोकादायक वृक्ष छाटण्याचे काम वन विभागाने हाती घेतले होते. प्रशासनाचे अधिकारी किनाºयालगतच्या गावांमध्ये राहून परिस्थितीवर नजर ठेवून होते. सायंकाळपर्यंत तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून वाºयाचा वेगही सामान्य होता, असे ते म्हणाले.जिल्हा प्रशासनाला नगरपालिका क्षेत्रासह किनाºयालगतच्या १३ गावांची संभाव्य माहिती देण्यात आली होती. त्यांच्याकडून डहाणू, नरपड आणि चिखले या गावांना संभाव्य धोका सांगण्यात आला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता डहाणू शहरातील सर्व दुकाने, कारखाने बंद करण्यात आले होते.आगरच्या दुबळापाडा या किनाºयालगत वस्तीतील कच्च्या घरांत राहणाºया शंभर नागरिकांना नजीकच्या बंगल्यात आणि वसतिगृहात हलविण्यात आले. मात्र परिस्थिती सामान्य असल्याने ते पुन्हा घराकडे परतले.- संजय पाटील/संदेश पाटील (निवारा केंद्रात मदत करणारे)तालुक्याला चक्रीवादळाचा संभाव्य इशारा देण्यात आला असला, तरी दिवसभर परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे निवारा केंद्रात गेलेले नागरिक घराकडे परतले असून दिवसभर कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक हालचालींवर प्रशासनाचे लक्ष असून ते सज्ज आहेत.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू