शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

पंधरा दिवसांत स्वाइनचे ९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:50 IST

ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे २५ जणांचा बळी गेला आहे. यातील तिघांचा मृत्यू हा जिल्ह्याबाहेर झाला आहे. तसेच स्वाइन फ्लूने बाधीत रूग्णांचा आकडा आतापर्यंत ५०७ वर गेला असून ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत ४०८ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ७६८ रुग्णांनी स्वाइनसंदर्भात तपासणी केली आहे. त्यातील ६०७ जण स्वाइन फ्लू संशयित म्हणून पुढे आले. या संशयितांपैकी ५०७ जणांना आतापर्यंत स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आनंदाची बाब म्हणजे, यातील ३५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर अजूनही १३४ रुग्ण उपचारार्थ जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल आहेत. मृतांचा आकडा २५आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात २५ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.कल्याणात ५९ बाधीत रुग्णजिल्ह्यातील विविध रुग्णालयात स्वाइन फ्लूचे १३४ रुग्ण दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याणात ५९ रुग्ण असून त्यापाठोपाठ ठाण्यात-५७, नवी मुंबईत-१२, मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत ६ रुग्णांचा समावेश आहे.ठामपानंतर केडीएमसीत रुग्णजिल्ह्यात आतापर्यंत स्वाइनची लागण झालेले सर्वाधिक २८४ रुग्ण ठामपा हद्दीत आढळले आहेत. त्यानंतर केडीएमसीमध्ये १२४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तर मीरा-भार्इंदरमध्येही ६६ रुग्ण असून नवी मुंबईत २४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तसेच उल्हासनगरात एकाला त्याची बाधा झाली आहे. दरम्यान, स्वाइनचे प्रमाण वाढते असूनही यावरील लस मिळवण्यात आरोग्य विभागाला अपयश आले आहे.तपासणीत नवी मुंबई आघाडीवर- १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लू संदर्भात १ लाख २५ हजार ७६८ जणांनी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नवी मुंबईत ७२ हजार ७०९ जणांनी तपासणी केली आहे. त्यानंतर ठाणे - ४०,५४५, उल्हासनगर-७,००६,मीरा-भार्इंदर- ३,६६९, कल्याण डोंबिवली-९२२ आणि भिवंडीत- ९१७ जणांनी फ्लूची तपासणी केली आहे.