शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

पंधरा दिवसांत स्वाइनचे ९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:50 IST

ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्याला बसलेला स्वाइनचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असून गेल्या पंधरा दिवसात स्वाइन फ्लूने ९ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे २५ जणांचा बळी गेला आहे. यातील तिघांचा मृत्यू हा जिल्ह्याबाहेर झाला आहे. तसेच स्वाइन फ्लूने बाधीत रूग्णांचा आकडा आतापर्यंत ५०७ वर गेला असून ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत ४०८ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ७६८ रुग्णांनी स्वाइनसंदर्भात तपासणी केली आहे. त्यातील ६०७ जण स्वाइन फ्लू संशयित म्हणून पुढे आले. या संशयितांपैकी ५०७ जणांना आतापर्यंत स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आनंदाची बाब म्हणजे, यातील ३५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर अजूनही १३४ रुग्ण उपचारार्थ जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल आहेत. मृतांचा आकडा २५आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात २५ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत ५, मीरा-भार्इंदर ४ आणि नवी मुंबई महापालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.कल्याणात ५९ बाधीत रुग्णजिल्ह्यातील विविध रुग्णालयात स्वाइन फ्लूचे १३४ रुग्ण दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक कल्याणात ५९ रुग्ण असून त्यापाठोपाठ ठाण्यात-५७, नवी मुंबईत-१२, मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत ६ रुग्णांचा समावेश आहे.ठामपानंतर केडीएमसीत रुग्णजिल्ह्यात आतापर्यंत स्वाइनची लागण झालेले सर्वाधिक २८४ रुग्ण ठामपा हद्दीत आढळले आहेत. त्यानंतर केडीएमसीमध्ये १२४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तर मीरा-भार्इंदरमध्येही ६६ रुग्ण असून नवी मुंबईत २४ जणांना स्वाइनची लागण झाली आहे. तसेच उल्हासनगरात एकाला त्याची बाधा झाली आहे. दरम्यान, स्वाइनचे प्रमाण वाढते असूनही यावरील लस मिळवण्यात आरोग्य विभागाला अपयश आले आहे.तपासणीत नवी मुंबई आघाडीवर- १ जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लू संदर्भात १ लाख २५ हजार ७६८ जणांनी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नवी मुंबईत ७२ हजार ७०९ जणांनी तपासणी केली आहे. त्यानंतर ठाणे - ४०,५४५, उल्हासनगर-७,००६,मीरा-भार्इंदर- ३,६६९, कल्याण डोंबिवली-९२२ आणि भिवंडीत- ९१७ जणांनी फ्लूची तपासणी केली आहे.