शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

उल्हासनगर भाजपात सिंधी-मराठी वाद

By admin | Updated: April 24, 2017 02:18 IST

महासभेत पाणीप्रश्नावरून भाजपा नगरसेवक राजेश वानखडे यांनी खडे बोल सुनावले. याप्रकाराने भाजपातील वाद चव्हाट्यावर आला

उल्हासनगर : महासभेत पाणीप्रश्नावरून भाजपा नगरसेवक राजेश वानखडे यांनी खडे बोल सुनावले. याप्रकाराने भाजपातील वाद चव्हाट्यावर आला असून वादाला सिंधी-मराठी वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. भाजपा, ओमी टीम व साई पक्षाने मराठी नगरसेवकांना मानाचे पद दिले नाही. सर्व पदे आपापसांत वाटून घेतल्याची भावना मराठी नगरसेवकांची झाली आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाचे (ओमी टीमसह) ३२, साई पक्षाचे ११ व रासपचा १ असे नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ताधारी भाजपातील एकूण ४४ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवक मराठी आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्यांसह सभापती अशी महत्त्वाची पदे सिंधी नगरसेवकांनी वाटून घेतली. याचा राग मराठी नगरसेवकांना आला असून त्यांची कोंडी वानखडे यांच्या रूपाने बाहेर पडली आहे. त्यांनी अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. केवळ १८०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सलग तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक १८ मधील सुभाष टेकडी परिसरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. मराठी नगरसेवकांना स्थानिक भाजपा कोअर कमिटीतील नेते डावलत असल्याचे चित्र आहे. पाण्यासाठी नाइलाजास्तव शिवसेनेच्या मांडीलामांडी लावून विरोध करण्यासाठी बसावे लागल्याची प्रतिक्रिया नगरसेवक वानखडे यांनी दिली. (प्रतिनिधी)