शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जिल्हाभरातील महोत्सवांतून होतेय व्यावसायिकांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:39 IST

खरेदीसाठी झुंबड; मंदीच्या वातावरणात मोठा दिलासा; गृहोद्योगांना मिळतेय हक्काची बाजारपेठ, ग्राहकांसाठी विविध उत्पादने उपलब्ध

- जान्हवी मोर्येडोंबिवली : केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी केलेला रोजगारनिर्मितीचा दावा फोल ठरला आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि त्यापाठोपाठ जागतिक मंदीची झळ देशातील सर्वच क्षेत्रांना बसली आहे. मंदीचे परिणाम स्थानिक पातळीवर दिसत असले तरी ठाणे, डोंबिवली, अंबरनाथमध्ये सध्या भरवलेल्या विविध महोत्सवांतून मोठी उलाढाल होत आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत असल्याने स्टॉलधारक व आयोजकांत समाधानाचे वातावरण आहे. पूर्वीपेक्षा हे उत्पन्न कमी असले तरी सध्या त्यांचा झालेला व्यवसाय पाहता मंदीचा फारसा फटका या महोत्सवांना बसला नसल्याचे चित्र डोंबिवलीत दिसून येत आहे.पूर्वी गावखेड्यांमधील जत्रा या ग्रामस्थांसाठी करमणुकीची मुख्य साधने असत. तीच काहीशी संकल्पना सध्या शहरात नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान भरवल्या जाणाऱ्या विविध महोत्सवांच्या माध्यमातून रूढ झाली आहे. खरेदीविक्रीचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मनोरंजनाचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हे महोत्सव एक आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. अनेक लहानमोठे उद्योजक, विविध वस्तंूचे व्यापारी, विक्रेते त्याकडे एक संधी म्हणून पाहतात.डोंबिवलीत दरवर्षी होणाºया महोत्सवांत पाकीटबंद खाद्यपदार्थ, कपडे, उपकरणे, दैनंदिन घरगुती उपयोगी वस्तू, शैक्षणिक वा शिक्षणोपयोगी वस्तू, विमा वा गुंतवणूकविषयक उत्पादने, वाहने, गृहप्रकल्प आदींचे स्टॉल्स असतात. तसेच येथे सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम मोफत असतात. स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी त्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळते. संपूर्ण कुटुंब एकाच वेळी खरेदी आणि करमणुकीचा आनंद येथे घेतात. महोत्सवांच्या आकर्षणामुळे यंदाच्या वर्षी त्याला नागरिकांचा प्रतिसाद १५ ते २० टक्क्यांनी वाढला आहे. स्टॉलधारकांना भाडे मोजावे लागत असले, तरी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येथे येत असल्याने एक मोठी बाजारपेठ त्यांना मिळते. जणूकाही हा महोत्सव म्हणजे छोटा मॉलच आहे. स्टॉलधारकांचा चांगल्यापैकी व्यवसाय होत असल्याने ते पुढील वर्षीचे आपल्या स्टॉलचे बुकिंगही लगेच करायचा प्रयत्न करतात.दहा वर्षांपासून न चुकता महोत्सवात येणारे स्टॉलधारकही आहेत, अशी माहिती एका महोत्सवाचे आयोजक विश्वास पुराणिक यांनी दिली. तर, आगरी महोत्सवाचे आयोजक गुलाब वझे म्हणाले, महोत्सवाला आर्थिक मंदीची झळ जाणवली नाही. एकाच ठिकाणी लोकांना सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. त्यामुळे लोक त्या खरेदी करतात. काही वस्तू केवळ या महोत्सवातच मिळतात. आगरी खाद्यपदार्थांची चव खवय्यांना चाखता येते. आगरी महोत्सव आता सर्वसमावेशक होऊ लागला आहे. त्यामुळे आगरी समाजाव्यतिरिक्त महोत्सवाला येणारा वर्गही आगरी जेवणाची चव चाखतात. मांडे हा पदार्थ महोत्सवातच नागिरकांना मिळेल.व्यवसायासाठी एक पर्वणीच स्टॉलधारक चिराग सूचक यांनी सांगितले, आम्ही १६ वर्षांपासून महोत्सवात स्टॉल लावत आहोत. पूर्वी एक स्टॉल लावत होतो. आता तीन स्टॉल लावतो. पूर्वी आम्हाला ३० ते ४० हजारांचा फायदा होत होता. मात्र, आता तो १५ ते २० हजार रुपयांवर आला आहे. पण, आता स्टॉलची संख्याही वाढविली आहे. दुकानात आम्हाला आठ दिवसांत १५ ते २० हजार रुपयांचा फायदा होत नाही. त्यामुळे महोत्सव आमच्यासाठी एक पर्वणीच आहे, असे म्हणावे लागेल.