शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

‘करून दाखवलं’साठी मौनसक्ती

By admin | Updated: July 30, 2016 04:45 IST

ठाण्यात होत असलेल्या किंवा होणाऱ्या विकासकामांची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल किंवा अन्य अधिकाऱ्यांनी करू नये, तर त्यांची घोषणा शिवसेनेचे नेते किंवा

ठाणे : ठाण्यात होत असलेल्या किंवा होणाऱ्या विकासकामांची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल किंवा अन्य अधिकाऱ्यांनी करू नये, तर त्यांची घोषणा शिवसेनेचे नेते किंवा महापौर हेच करतील, अशी सक्ती सुरू झाली आहे. नोकरशहांनी घोषणा केली तर त्याचे श्रेय मंत्रालयात बसलेले भाजपाचे नेते घेतील व त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ‘करून दाखवलं’चा डंका पिटता येणार नाही, त्यामुळे ही मौनसक्ती लादल्याची चर्चा आहे.ठामपाची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे ठाण्यात श्रेयाचे राजकारण आणखी तापू लागले आहे. पालिकेच्या अनेक प्रकल्पांची घोषणा सत्ताधारी मंडळी करू लागली आहे. तीनहातनाका येथे राबवण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, मनोरुग्णालय येथील विस्तारीत रेल्वे स्टेशन तसेच अंतर्गत जलवाहतूक या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. येत्या काळात ठाण्यासाठी होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांची घोषणा पालिका प्रशासन करणार होते. परंतु, त्यांच्याकडून अशा घोषणा करण्याचे अधिकारच सत्ताधारी शिवसेनेने काढून घेतल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)सारे काही जाहिराती आणि मतांसाठीमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विकास हा कळीचा मुद्दा ठरणार असून सुशिक्षित ठाणेकर मतदान करताना तात्कालीक मुद्द्यांबरोबरच गेल्या पाच वर्षांतील कामांचा विचार करणार आहे. या प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकार मंजुरी देणार असल्याने साहजिकच याचे श्रेय काही प्रमाणात भाजपाला जाऊन आपला मतांचा टक्का कमी होऊ शकतो, हे शिवसेनेने गृहीत धरले आहे. मात्र, निदान या प्रकल्पांची घोषणा प्रशासनाने न करता आपण केली तर त्याचे श्रेय घेण्याकरिता शिवसेना हे प्रकल्प आपल्या वचननाम्यावर हक्काने प्रसिद्ध करू शकते, असे त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वाटते.