शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘करून दाखवलं’साठी मौनसक्ती

By admin | Updated: July 30, 2016 04:45 IST

ठाण्यात होत असलेल्या किंवा होणाऱ्या विकासकामांची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल किंवा अन्य अधिकाऱ्यांनी करू नये, तर त्यांची घोषणा शिवसेनेचे नेते किंवा

ठाणे : ठाण्यात होत असलेल्या किंवा होणाऱ्या विकासकामांची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल किंवा अन्य अधिकाऱ्यांनी करू नये, तर त्यांची घोषणा शिवसेनेचे नेते किंवा महापौर हेच करतील, अशी सक्ती सुरू झाली आहे. नोकरशहांनी घोषणा केली तर त्याचे श्रेय मंत्रालयात बसलेले भाजपाचे नेते घेतील व त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ‘करून दाखवलं’चा डंका पिटता येणार नाही, त्यामुळे ही मौनसक्ती लादल्याची चर्चा आहे.ठामपाची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे ठाण्यात श्रेयाचे राजकारण आणखी तापू लागले आहे. पालिकेच्या अनेक प्रकल्पांची घोषणा सत्ताधारी मंडळी करू लागली आहे. तीनहातनाका येथे राबवण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, मनोरुग्णालय येथील विस्तारीत रेल्वे स्टेशन तसेच अंतर्गत जलवाहतूक या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. येत्या काळात ठाण्यासाठी होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांची घोषणा पालिका प्रशासन करणार होते. परंतु, त्यांच्याकडून अशा घोषणा करण्याचे अधिकारच सत्ताधारी शिवसेनेने काढून घेतल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)सारे काही जाहिराती आणि मतांसाठीमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विकास हा कळीचा मुद्दा ठरणार असून सुशिक्षित ठाणेकर मतदान करताना तात्कालीक मुद्द्यांबरोबरच गेल्या पाच वर्षांतील कामांचा विचार करणार आहे. या प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकार मंजुरी देणार असल्याने साहजिकच याचे श्रेय काही प्रमाणात भाजपाला जाऊन आपला मतांचा टक्का कमी होऊ शकतो, हे शिवसेनेने गृहीत धरले आहे. मात्र, निदान या प्रकल्पांची घोषणा प्रशासनाने न करता आपण केली तर त्याचे श्रेय घेण्याकरिता शिवसेना हे प्रकल्प आपल्या वचननाम्यावर हक्काने प्रसिद्ध करू शकते, असे त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वाटते.