शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘मिशन वालधुनी’त कारखान्यांच्या प्रदूषणावर मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 06:06 IST

ज्या रासायनिक कारखान्यांमुळे किंवा त्यांच्या सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित होते, त्याबाबत अवाक्षरही न काढता ही नदी वाचवण्याची शपथ मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी पदयात्रा काढली गेली, जलसंवाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर  : ज्या रासायनिक कारखान्यांमुळे किंवा त्यांच्या सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित होते, त्याबाबत अवाक्षरही न काढता ही नदी वाचवण्याची शपथ मंगळवारी घेण्यात आली. त्यासाठी पदयात्रा काढली गेली, जलसंवाद झाला. मिशन वालधुनी पार पडले. तसेच या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष निधी आणण्याचे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.उल्हासनगरच्या वर्धापनदिनानिमित्त प्रथमच मिशन वालधुनी हा कार्यक्रम राबविण्यात आला. शहराच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्त ६८ प्रश्नांची प्रश्नावली भरून घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सकाळी साडेसात वाजता उल्हासनगर रेल्वे स्टेशन ते चांदीबाई महाविद्यालयादरम्यान वालधुनी नदीकिनारी जलपुरूष राजेंद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, महापौर मीना आयलानी, पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा आदीसह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. राजेंद्र सिंग यांनी नदीची पाहणी करून ती वाचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले.या पदयात्रेनंतर सर्वांनी ऐतिहासिक कोनशिलेकडे मोर्चा वळविला आाणि तिला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नदी संवर्धनाबाबत दुपारी जलसंवाद झाला. त्यात राजेंद्र सिंग यांच्यासह उपस्थितांनी मार्गदर्शन केले. वालधुनी बिरादरी व रोटरी क्लब यांनी ६८ प्रश्नांच्या प्रश्नावलीतील उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार केला.