शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

फेरीवाल्यांसह अनधिकृत गोष्टींवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: October 5, 2016 02:33 IST

रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’द्वारे ठाणे, कल्याण आणि दिवा या जंक्शनबरोबर इतर रेल्वे स्थानकातील

ठाणे : रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’द्वारे ठाणे, कल्याण आणि दिवा या जंक्शनबरोबर इतर रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेचा लेखाजोखा मांडला. त्याची दखल महाराष्ट्र प्रदेश झोनल रेल्वे कमिटी सदस्य (स्पॉट चेक अथॉरिटी, मध्य रेल्वे) कांचन खरे यांनी घेतली. मध्य रेल्वेच्या स्थानकांसह आजूबाजूच्या आवारात फेरीवाल्यांसह ज्या अनधिकृत गोष्टीमुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते. त्यांना वेळीच आळा घालण्यास रेल्वे प्रशासन, आरपीएफ, महापालिका आणि शहर पोलीस यांना एकत्र आणून त्याच्या माध्यमातून रेल्वे परिसरातील स्वच्छतेवर भर देणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ठाणे-दिवा-कल्याण या जंक्शन असलेल्या स्थानकात अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे मान्य करून त्यांनी कल्याण हे सर्वाधिक अस्वच्छता असलेले स्थानक असल्याचे शिक्कामोर्तब केले. या स्थानकातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेला वेळीच पायबंद करण्यासाठी रेल्वे प्रशासन-आरपीएफ, शहर पोलीस आणि महापालिका यांना एकत्र आणून स्थानकातील अनधिकृत फेरीवाले, भिकारी, गर्दुले असो या पार्किंग यांना आळा घालण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी कल्याण -डोंबिवली महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने स्थानकातील कचरा मुक्तीसाठी विशेष मोहिम राबवली होती. त्याचप्रमाणे अस्वच्छता आणि दुर्गंधीला आळा घातला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा फेरीवाले हटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर अनाधिकृत पार्र्किंग, भिकारी आणि गर्दुले हटविण्यास प्राधान्य देणार आहे.गर्दुल्यांबाबत सामाजिक संस्था आणि पोलसांमार्फत मोहिम राबविताना, त्यांच्यात जनजागृती करताना, त्यांची नोंदणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कल्याणपाठोपाठ डोंबिवली, दिवा आणि ठाणे असे स्थानक घेऊन तेथील प्रशासनामार्फत स्वच्छतेवर भर देताना, दिव्यात खास असे लक्ष दिले जाईल. तसेच ज्या लांबपल्लयाच्या गाड्यांमुळे होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बायोटॉयलेट हा पर्याय आणला असून त्याची मध्य रेल्वे मार्गावरही लवकर अमंलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सोयींमुळे प्रवाशांना याची सवय होईल. पण त्यांनी ते जपणेही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)