शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

फेरीवाल्यांसह अनधिकृत गोष्टींवर कारवाईचे संकेत

By admin | Updated: October 5, 2016 02:33 IST

रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’द्वारे ठाणे, कल्याण आणि दिवा या जंक्शनबरोबर इतर रेल्वे स्थानकातील

ठाणे : रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’द्वारे ठाणे, कल्याण आणि दिवा या जंक्शनबरोबर इतर रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेचा लेखाजोखा मांडला. त्याची दखल महाराष्ट्र प्रदेश झोनल रेल्वे कमिटी सदस्य (स्पॉट चेक अथॉरिटी, मध्य रेल्वे) कांचन खरे यांनी घेतली. मध्य रेल्वेच्या स्थानकांसह आजूबाजूच्या आवारात फेरीवाल्यांसह ज्या अनधिकृत गोष्टीमुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते. त्यांना वेळीच आळा घालण्यास रेल्वे प्रशासन, आरपीएफ, महापालिका आणि शहर पोलीस यांना एकत्र आणून त्याच्या माध्यमातून रेल्वे परिसरातील स्वच्छतेवर भर देणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ठाणे-दिवा-कल्याण या जंक्शन असलेल्या स्थानकात अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचे मान्य करून त्यांनी कल्याण हे सर्वाधिक अस्वच्छता असलेले स्थानक असल्याचे शिक्कामोर्तब केले. या स्थानकातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेला वेळीच पायबंद करण्यासाठी रेल्वे प्रशासन-आरपीएफ, शहर पोलीस आणि महापालिका यांना एकत्र आणून स्थानकातील अनधिकृत फेरीवाले, भिकारी, गर्दुले असो या पार्किंग यांना आळा घालण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी कल्याण -डोंबिवली महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने स्थानकातील कचरा मुक्तीसाठी विशेष मोहिम राबवली होती. त्याचप्रमाणे अस्वच्छता आणि दुर्गंधीला आळा घातला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा फेरीवाले हटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर अनाधिकृत पार्र्किंग, भिकारी आणि गर्दुले हटविण्यास प्राधान्य देणार आहे.गर्दुल्यांबाबत सामाजिक संस्था आणि पोलसांमार्फत मोहिम राबविताना, त्यांच्यात जनजागृती करताना, त्यांची नोंदणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कल्याणपाठोपाठ डोंबिवली, दिवा आणि ठाणे असे स्थानक घेऊन तेथील प्रशासनामार्फत स्वच्छतेवर भर देताना, दिव्यात खास असे लक्ष दिले जाईल. तसेच ज्या लांबपल्लयाच्या गाड्यांमुळे होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बायोटॉयलेट हा पर्याय आणला असून त्याची मध्य रेल्वे मार्गावरही लवकर अमंलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सोयींमुळे प्रवाशांना याची सवय होईल. पण त्यांनी ते जपणेही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)