शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कल्याणमध्ये दुकानांचे शटर ‘डाउन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:38 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्त ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शुक्रवारी जारी केले. त्यानुसार, शनिवारी कल्याणमध्ये रेल्वेस्थानक रोड आणि बाजारपेठ परिसरातील सर्व दुकाने बंद होती. विशेष म्हणजे फेरीवाल्यांनीही या आदेशाला चांगला प्रतिसाद देत आपला व्यवसाय बंद ठेवला.

महापालिकेने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना यापूर्वीच ११ मार्चपासून विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. त्यात आता पुन्हा शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय इतक्या तातडीने घेतल्याने दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीत त्याचे पडसाद उमटले. मात्र, दुकानदारांच्या या विरोधावर आयुक्तांनी त्यांचा निर्णय मागे घेतला नाही. कोरोना रोखणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट समोर असल्याने त्यात हयगय केली जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, कल्याण रेल्वेस्थानक परिसर, बिर्ला रोड परिसर, मोहने आणि आंबिवली परिसरांतही दुकाने बंद होती. मात्र, किराणा, दूध, औषधांची दुकाने, दवाखाने अशा अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही. दुसरीकडे मनपाने होळी व धूळवड साजरी करण्यावर निर्बंध लादले आहेत. आयुक्तांच्या आदेशामुळे रविवारी होळीच्या दिवशीही दुकाने बंद राहणार आहेत.

एपीएमसी आज राहणार बंद

- मनपा हद्दीतील भाजी मंडया ५० टक्के क्षमतेनुसार चालवण्यात येतील, असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले होते. त्यानुसार, शनिवारी भाजी मंडया ५० टक्के क्षमतेनुसार सुरू होत्या. मात्र, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर कल्याण-शीळ रस्त्यावर काही भाजी व्यापारी, विक्रेते त्यांचा माल विकताना दिसून आले.

- मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार रविवारी बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे. दररविवारी बाजार समिती बंद ठेवली जाते. रविवारी बाजार समितीत स्वच्छता, जंतुनाशक फवारणी केली जाते. रविवारी बाजार समितीच्या बाहेर शेतमालाचा व्यापार सुरू असतो. मात्र, त्याला काही इलाज नाही, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

----------------