शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

श्रीकांत यांचे मताधिक्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:03 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघ : तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने विजयी

कल्याण : लोकसभा कल्याण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे यंदा तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने विजयी झाले. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दोन लाख ५० हजार ७४९ मताधिक्य मिळाले होते. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदाचे मताधिक्य ९३ हजार ५९४ मतांनी वाढले आहे.

कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत सेनेचे शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात रंगली. शिंदे यांनी पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. शिंदे यांना पाच लाख ५९ हजार ७२३ मते (६२.९ टक्के) मिळाली आहेत, तर पाटील यांना दोन लाख १५ हजार ३८० मते (२४.२ टक्के) मिळाली.

तिसºया क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना मिळाली. प्रथमच निवडणूक लढवणाºया वंचित आघाडीने ६५ हजार ५७२ मतांपर्यंत मजल मारली. त्यांना एकूण मतांपैकी ७.४ टक्के मते मिळाली. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव निकालावर पडला नसल्याचे पाहायला मिळते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे हे नवखे होते. त्यावेळी त्यांना चार लाख ४० हजार ८९२ मते मिळाली होती. तर, त्यावेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी एक लाख ९० हजार १४३ मते पटकावली होती. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादीला २५ हजार २३७ मते अधिक मिळाली आहेत.

दरम्यान, मागील वेळेस टपालाद्वारे एकूण ५९८ मते मिळाली होती. त्यापैकी शिंदे यांना ३१८, तर आनंद परांजपे यांना १३७ टपालाद्वारे मते मिळाली होती. यंदा श्रीकांत शिंदे यांना १७०० टपाली मते, तर बाबाजी पाटील यांना ३६६ टपाली मते मिळाली आहेत.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचेच प्राबल्यराष्ट्रवादीचा बालेकि ल्ला असलेल्या मुंब्रा-कळव्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्राबल्य असल्याचे दिसून आले. पाटील यांना या विधानसभा मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली आहेत. तर, सेनेच्या शिंदेंना ६७ हजार ४५५ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीला नऊ हजार ८८१ चे मताधिक्य मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांनाही येथे पाच हजार २१० इतकी मते मिळाली आहेत.‘नोटा’ चिंतेची बाब२०१४ मध्ये नोटा मतांची संख्या नऊ हजार १८५ इतकी होती. यंदा मात्र ही संख्या १३ हजार १२ पर्यंत गेली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या तीन हजार ८२७ ने वाढली आहे. ही राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.कल्याण ग्रामीणमध्ये सेनेची बाजी२०१४ च्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना १२ हजार २५६ मतांची आघाडी मिळाली होती. दरम्यान, यंदाचे उमेदवार पाटील यांनी भूमिपुत्र म्हणून आगरीकार्डचा मुद्दा प्रचारात आणला होता. त्यामुळे त्यांना कल्याण ग्रामीणमधून भरभरून मते मिळतील, असा अंदाज होता. परंतु, तो फोल ठरला आहे. तेथे त्यांना ४३ हजार ८६९ मते मिळाली, तर सेनेच्या शिंदेंनी येथून एक लाख २६ हजार ६०७ मते पटकावली आहेत. महत्त्वाचे म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कल्याण ग्रामीणमध्येच सर्वाधिक मते शिंदे यांना मिळाली आहेत.