शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत यांचे मताधिक्य वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:03 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघ : तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने विजयी

कल्याण : लोकसभा कल्याण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे यंदा तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने विजयी झाले. गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना दोन लाख ५० हजार ७४९ मताधिक्य मिळाले होते. गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदाचे मताधिक्य ९३ हजार ५९४ मतांनी वाढले आहे.

कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत सेनेचे शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात रंगली. शिंदे यांनी पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. शिंदे यांना पाच लाख ५९ हजार ७२३ मते (६२.९ टक्के) मिळाली आहेत, तर पाटील यांना दोन लाख १५ हजार ३८० मते (२४.२ टक्के) मिळाली.

तिसºया क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांना मिळाली. प्रथमच निवडणूक लढवणाºया वंचित आघाडीने ६५ हजार ५७२ मतांपर्यंत मजल मारली. त्यांना एकूण मतांपैकी ७.४ टक्के मते मिळाली. मात्र, त्यांचा फारसा प्रभाव निकालावर पडला नसल्याचे पाहायला मिळते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिंदे हे नवखे होते. त्यावेळी त्यांना चार लाख ४० हजार ८९२ मते मिळाली होती. तर, त्यावेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी एक लाख ९० हजार १४३ मते पटकावली होती. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राष्ट्रवादीला २५ हजार २३७ मते अधिक मिळाली आहेत.

दरम्यान, मागील वेळेस टपालाद्वारे एकूण ५९८ मते मिळाली होती. त्यापैकी शिंदे यांना ३१८, तर आनंद परांजपे यांना १३७ टपालाद्वारे मते मिळाली होती. यंदा श्रीकांत शिंदे यांना १७०० टपाली मते, तर बाबाजी पाटील यांना ३६६ टपाली मते मिळाली आहेत.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचेच प्राबल्यराष्ट्रवादीचा बालेकि ल्ला असलेल्या मुंब्रा-कळव्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्राबल्य असल्याचे दिसून आले. पाटील यांना या विधानसभा मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली आहेत. तर, सेनेच्या शिंदेंना ६७ हजार ४५५ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीला नऊ हजार ८८१ चे मताधिक्य मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडावू यांनाही येथे पाच हजार २१० इतकी मते मिळाली आहेत.‘नोटा’ चिंतेची बाब२०१४ मध्ये नोटा मतांची संख्या नऊ हजार १८५ इतकी होती. यंदा मात्र ही संख्या १३ हजार १२ पर्यंत गेली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या तीन हजार ८२७ ने वाढली आहे. ही राजकीय पक्षांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.कल्याण ग्रामीणमध्ये सेनेची बाजी२०१४ च्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना १२ हजार २५६ मतांची आघाडी मिळाली होती. दरम्यान, यंदाचे उमेदवार पाटील यांनी भूमिपुत्र म्हणून आगरीकार्डचा मुद्दा प्रचारात आणला होता. त्यामुळे त्यांना कल्याण ग्रामीणमधून भरभरून मते मिळतील, असा अंदाज होता. परंतु, तो फोल ठरला आहे. तेथे त्यांना ४३ हजार ८६९ मते मिळाली, तर सेनेच्या शिंदेंनी येथून एक लाख २६ हजार ६०७ मते पटकावली आहेत. महत्त्वाचे म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कल्याण ग्रामीणमध्येच सर्वाधिक मते शिंदे यांना मिळाली आहेत.