शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

निमंत्रित कवींनी उधळले श्रावणरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:42 IST

ठाणे : तरुण पिढीनेही गझलकडे वळण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी शनिवारी व्यक्त केले. ...

ठाणे : तरुण पिढीनेही गझलकडे वळण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी शनिवारी व्यक्त केले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने शनिवारी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शेख यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या गझलांमधून रसिकांचे मन जिंकले.

प्रमुख पाहुणे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नव्या पिढीकडून नवीन विचार ऐकायला मिळत असल्याचे कौतुक करीत आपल्या खास गझल सादर केल्या. पावसाच्या आणि श्रावणाच्या विविध छटा निमंत्रित कवींनी आपल्या कवितेतून सादर केल्या. या संमेलनात दुर्गेश सोनार, गीतेश शिंदे, संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, प्रथमेश पाठक, जितेंद्र लाड, विजयराज बोधनकर, रामदास खरे, निकिता भागवत, वृषाली विनायक या कवींनी कवितांचे श्रावणरंग उधळले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचा उद्देश अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक यांनी विशद केला. ते म्हणाले की, भारतीय भाषांचे स्नेहमिलन करणारी ही संस्था आहे आणि आजच्या तरुण पिढीने सामाजिक संवेदना ओळखून लिहिले पाहिजे. यावेळी महापौर नरेश म्हस्के, नगरसेवक राजेश मोरे, आकाशवाणी पुणे वृत्त संचालक नितीन केळकर, मध्य - पश्चिम रेल्वे वित्त अधिकारी सुनील वारे यांची विशेष उपस्थिती होती.