शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्पदंश औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:52 IST

रुग्णांवर अन्यत्र उपचार : आरोग्य केंद्रांतील गैरसोयींमुळे हैराण

सुुरेश लोखंडे।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे ग्रामीण भागांत विंचू, सर्पदंशाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचा अभाव असण्यासह औषधांचा तुटवडा असल्याचा अनुभव वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य कैलास जाधव यांनी घेतल्याचे सांगितले.शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांमधील केंद्रांमध्येही औषधांचा अभाव असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सांगत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणल्यास नाइलाज असल्याचे ते सांगत असल्याचे जाधव यांनी सांगितले. भिवंडी तालुक्यातील झिडके येथील सरपंच शंकर जाधव यांना सर्पदंश झाला असता त्यांना उपचारासाठी या वज्रेश्वरी आरोग्यकेंद्रात नेले होते. मात्र, तेथे डॉक्टर नव्हते, तसेच रुग्णाला हलवण्यासाठी रुग्ण्वाहिकेचा चालकही नसल्यामुळे या रुग्णास उपचारापासून वंचित राहावे लागल्याचे जाधव यांनी सांगितले.याप्रमाणेच या आरोग्य केंद्रात वेढेगाव येथील रवींद्र मुकणे, सर्पदंशावर काही दिवसांपासून उपचार घेत आहेत. विंचू चावलेल्या दिघाशी येथील वनीता मराठे, सर्पदंश झालेल्या रिया पाटील यांच्यावर वज्रेश्वरी आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. पण, त्यांना सर्प व विंचूदंश दूर करण्याचा औषधीचा डोस न मिळाल्यामुळे पडून होत्या. या सर्व रुग्णांना अन्यत्र म्हणजे भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला. पण, आरोग्य केंद्रात चालक नसल्यामुळे व गाडीही नादुरुस्त असल्यामुळे या रुग्णांना अन्यत्र हलवता आले नसल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले. तर, मुरबाड येथील जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांनीदेखील जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच डॉक्टरांचा अभाव असून औषधीसाठाही पुरेसा नसल्याचे निदर्शनात आणून दिले.पालकमंत्र्यांचे आदेशही बसवले धाब्यावरजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अत्यावश्यक सर्प, विंचूदंशावरील उपाययोजनेच्या औषधीचा साठा उपलब्ध नसल्याचे घरत व जाधव यांनी सांगितले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी हिरालाल सोनवणे यांनी मान्सूनपूर्व उपाययोजना आढावा बैठकीत आरोग्य अधिकाºयांना औषधीसाठा पुरेशा प्रमाणात ठेवण्याचे आदेश दिलेले आहे. एवढेच नव्हे तर राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्रातील योजनांचा आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनीदेखील जिल्हा आरोग्य अधिकाºयांना सतर्कतेचा इशारा देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना आरोग्यसेवा सुरळीत देण्याचे आदेश जारी केले आहे. पण, खुद्द जिल्हा परिषद सदस्यांनीच आरोग्य केंद्रातील प्रत्यक्ष अनुभवावरून औषधीसाठा व डॉक्टरांचा अभाव असल्याचे लोकमतच्या निदर्शनात आणून दिले आहे.