शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

अंबरनाथ-बदलापुरात कोविड लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:39 IST

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २५० नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेत आता केवळ एक हजार डोस शिल्लक ...

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २५० नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेत आता केवळ एक हजार डोस शिल्लक असून ते केवळ चार दिवस पुरणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने पाच हजार डोसची मागणी केली आहे.

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी एकच केंद्र असून त्या ठिकाणी दररोज २५० नागरिकांना देण्यात येत आहे. लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील प्रशासन फक्त एकाच केंद्रावर लसीकरण करीत आहेत. जोपर्यंत लसींचा पुरवठा वाढत नाही तोपर्यंत केंद्र वाढविण्यात काही एक अर्थ नसल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली जात आहे. दररोज हजार नागरिकांना लस देता येईल त्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र, लसींचा पुरवठा अल्प असल्याने २५० नागरिकांना त्रास देणे शक्य होत आहे. आजघडीला अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एक हजार लस शिल्लक असून ते अवघे तीन ते चार दिवसच पुरवणार आहेत. अल्पप्रमाणात लस शिल्लक असल्याची बातमी नागरिकांपर्यंत जात असल्याने आता डोस घेण्यासाठी आणि त्यासाठी लागणारे टोकण मिळवण्यासाठी पहाटे सहा वाजल्यापासून नागरिक रांग लावत आहेत.

बदलापुरातदेखील लसींचा पुरवठा बंद असल्याने अवघे दोन दिवस पुरेल एवढ्या लस शिल्लक असून बदलापूर पालिकेने पाच हजार लस उपलब्ध व्हावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. बदलापुरातदेखील चार केंद्रांमध्ये दररोज २५० नागरिकांना लस देण्यात येत असून त्या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.