शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘अवकाळी’चा फटका!

By admin | Updated: March 5, 2016 01:36 IST

सकाळी शहरी व ग्रामीण भागात अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळला

ठाणे : जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारपासून अवकाळी पावसाच्या तुरळक सरी झाल्या. मात्र, शुक्रवारी सकाळी शहरी व ग्रामीण भागात अर्धा ते पाऊण तास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पाऊस कोसळला. या पावसाचा आंब्याच्या मोहराला तसेच भेंडी, काकडी, वांगी आदी भाज्यांना फटका बसला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. मात्र, त्याच वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी शहरी भागांत तरुणाईने हा पाऊस एन्जॉय केला.गेल्या पाच-सहा दिवसांपासून उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले होते. गुरुवारी सायंकाळपासून काही भागांत पावसाचा शिडकावा सुरू झाला. शुक्रवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते. सकाळी साडेनऊ-दहा वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. रस्ते चिंब भिजले. सकाळी कार्यालय गाठणाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. दिवा येथे पेंटाग्राफ जळाल्याने तर बदलापूर येथे वीजपुरवठा खंडित झाल्याने उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती. जिल्ह्याच्या काही भागांतून फळभाज्या, पालेभाज्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. आंब्याच्या मोहरालाही पावसाने फटका दिला. काजूचेही नुकसान केले. एकीकडे ग्रामीण भागात यामुळे शेतकरी हताश झालेला असताना शहरी भागांत तरुणाईने पावसाचा आनंद लुटला. तलावपाळी, उपवन परिसरात तरुणाई पावसाचा आनंद घेताना दिसली.भिवंडी : पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावरील अंजूरफाटा व माणकोली भागांत मुख्यत्वे वाहतूककोंडी झाली होती. अचानक झालेल्या पावसामुळे दहावीच्या परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठताना त्रास झाला. पहाटे ५ वाजल्यापासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून अचानक वाढलेल्या उन्हाळ्याने बेजार झालेल्या नागरिकांना पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळाला. अडगळीतील छत्र्या बाहेर निघाल्या. काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने यंत्रमाग बंद पडले. दुपारी पाऊस थांबल्याने शहरातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले.