शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

‘ठाणे शहर’ शिवसेनेने गमावलेच

By admin | Updated: February 24, 2017 07:06 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द आणि एकत्रितपणे ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे शिवसेनेला तब्बल २५ वर्षांनंतर ठाण्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत गमावलेला ठाणे शहर हा मतदारसंघ त्यांना पुन्हा काबीज करता आलेला नाही.चारसदस्यीय पॅनल हे शिवसेनेच्या फायद्याचे ठरले असून अनेक प्रभागात शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. आता कुणाच्याही कुबड्या न घेता त्यांना पुढील पाच वर्षे सत्तेची गोड फळे चाखण्यास मिळणार आहेत.या निवडणुकीत शिवसेनेने सुरुवातीपासून ७५ जागांचा दावा केला होता. परंतु, काही गणिते बिघडल्याने आणि काही ठिकाणी अतिआत्मविश्वासामुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. परंतु, दिव्यासकट, घोडबंदर, वागळे, किसननगर, कोपरी या भागात शिवसेनेने मारलेल्या जोरदार मुसंडीच्या जोरावर शिवसेनेला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळून त्यांनी ६७ जागांवर कब्जा केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेला ठाणे शहर हा मतदारसंघ म्हणजे बालेकिल्ला गमावावा लागला होता. त्यामुळे हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शिवसेनेने सावध पावले उचलली होती. उमेदवार देतानाही कोणीही नाराज होणार नाही आणि दिग्गजांनाच संधी देऊन हा गड काबीज करण्याची रणनीती आखली होती. परंतु, मतदारांनी विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतदेखील भाजपाला झुकते माप दिले आणि या पट्ट्यात शिवसेनेचा पराभव झाला. दिव्यात शिवसेनेने मिळवलेले यशही नाकारता येणार नाही. या ठिकाणी भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांना पाचारण केले होते. मनसेनेदेखील राज ठाकरे यांना दोन वेळा आणले होते. परंतु, शिवसेनेने येथे केवळ विभागीय मेळाव्यावर भर देऊन येथे ११ पैकी ८ जागा मिळवल्या आहेत. एका जागेवर त्यांना सुमित भोईर यांच्या पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांनी दाखवलेले कसब आणि त्यांनी प्रत्येक विभागाची उचललेली जबाबदारी यामुळे शिवसेना भाजपाच्या वरचढ ठरल्याचे दिसून आले आहे. शिवाय, शिवसैनिकांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेला एकनिष्ठपणा, एकोपा, ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची धमक, निष्ठावंतांना एकत्रित घेऊन चालण्याची खेळलेली चाल आणि शिवसेनेने जेवढे आयाराम पक्षात घेतले, त्यातील एखाददुसरे नाणे खोटे ठरता इतर नाणी खणखणीत वाजल्याने शिवसेनेला यश मिळाले. एकूणच शिवसेना ठाण्यात भाजपाच्या सर्वच बाजूंनी वरचढ ठरली आणि यातूनच त्यांना एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्न साकार करता आले आहे.