शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
4
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
5
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
6
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
7
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
8
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
9
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
10
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
11
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
12
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
13
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
14
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
15
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
16
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
17
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
18
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
19
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
20
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
Daily Top 2Weekly Top 5

‘ठाणे शहर’ शिवसेनेने गमावलेच

By admin | Updated: February 24, 2017 07:06 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द आणि एकत्रितपणे ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे शिवसेनेला तब्बल २५ वर्षांनंतर ठाण्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत गमावलेला ठाणे शहर हा मतदारसंघ त्यांना पुन्हा काबीज करता आलेला नाही.चारसदस्यीय पॅनल हे शिवसेनेच्या फायद्याचे ठरले असून अनेक प्रभागात शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. आता कुणाच्याही कुबड्या न घेता त्यांना पुढील पाच वर्षे सत्तेची गोड फळे चाखण्यास मिळणार आहेत.या निवडणुकीत शिवसेनेने सुरुवातीपासून ७५ जागांचा दावा केला होता. परंतु, काही गणिते बिघडल्याने आणि काही ठिकाणी अतिआत्मविश्वासामुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. परंतु, दिव्यासकट, घोडबंदर, वागळे, किसननगर, कोपरी या भागात शिवसेनेने मारलेल्या जोरदार मुसंडीच्या जोरावर शिवसेनेला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळून त्यांनी ६७ जागांवर कब्जा केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेला ठाणे शहर हा मतदारसंघ म्हणजे बालेकिल्ला गमावावा लागला होता. त्यामुळे हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शिवसेनेने सावध पावले उचलली होती. उमेदवार देतानाही कोणीही नाराज होणार नाही आणि दिग्गजांनाच संधी देऊन हा गड काबीज करण्याची रणनीती आखली होती. परंतु, मतदारांनी विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतदेखील भाजपाला झुकते माप दिले आणि या पट्ट्यात शिवसेनेचा पराभव झाला. दिव्यात शिवसेनेने मिळवलेले यशही नाकारता येणार नाही. या ठिकाणी भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांना पाचारण केले होते. मनसेनेदेखील राज ठाकरे यांना दोन वेळा आणले होते. परंतु, शिवसेनेने येथे केवळ विभागीय मेळाव्यावर भर देऊन येथे ११ पैकी ८ जागा मिळवल्या आहेत. एका जागेवर त्यांना सुमित भोईर यांच्या पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांनी दाखवलेले कसब आणि त्यांनी प्रत्येक विभागाची उचललेली जबाबदारी यामुळे शिवसेना भाजपाच्या वरचढ ठरल्याचे दिसून आले आहे. शिवाय, शिवसैनिकांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेला एकनिष्ठपणा, एकोपा, ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची धमक, निष्ठावंतांना एकत्रित घेऊन चालण्याची खेळलेली चाल आणि शिवसेनेने जेवढे आयाराम पक्षात घेतले, त्यातील एखाददुसरे नाणे खोटे ठरता इतर नाणी खणखणीत वाजल्याने शिवसेनेला यश मिळाले. एकूणच शिवसेना ठाण्यात भाजपाच्या सर्वच बाजूंनी वरचढ ठरली आणि यातूनच त्यांना एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्न साकार करता आले आहे.