शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

‘ठाणे शहर’ शिवसेनेने गमावलेच

By admin | Updated: February 24, 2017 07:06 IST

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आखलेली रणनीती, निष्ठावंतांना दिलेले शब्द आणि एकत्रितपणे ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे शिवसेनेला तब्बल २५ वर्षांनंतर ठाण्यात स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत गमावलेला ठाणे शहर हा मतदारसंघ त्यांना पुन्हा काबीज करता आलेला नाही.चारसदस्यीय पॅनल हे शिवसेनेच्या फायद्याचे ठरले असून अनेक प्रभागात शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. आता कुणाच्याही कुबड्या न घेता त्यांना पुढील पाच वर्षे सत्तेची गोड फळे चाखण्यास मिळणार आहेत.या निवडणुकीत शिवसेनेने सुरुवातीपासून ७५ जागांचा दावा केला होता. परंतु, काही गणिते बिघडल्याने आणि काही ठिकाणी अतिआत्मविश्वासामुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. परंतु, दिव्यासकट, घोडबंदर, वागळे, किसननगर, कोपरी या भागात शिवसेनेने मारलेल्या जोरदार मुसंडीच्या जोरावर शिवसेनेला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळून त्यांनी ६७ जागांवर कब्जा केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेला ठाणे शहर हा मतदारसंघ म्हणजे बालेकिल्ला गमावावा लागला होता. त्यामुळे हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी शिवसेनेने सावध पावले उचलली होती. उमेदवार देतानाही कोणीही नाराज होणार नाही आणि दिग्गजांनाच संधी देऊन हा गड काबीज करण्याची रणनीती आखली होती. परंतु, मतदारांनी विधानसभेप्रमाणेच महापालिका निवडणुकीतदेखील भाजपाला झुकते माप दिले आणि या पट्ट्यात शिवसेनेचा पराभव झाला. दिव्यात शिवसेनेने मिळवलेले यशही नाकारता येणार नाही. या ठिकाणी भाजपाने थेट मुख्यमंत्र्यांना पाचारण केले होते. मनसेनेदेखील राज ठाकरे यांना दोन वेळा आणले होते. परंतु, शिवसेनेने येथे केवळ विभागीय मेळाव्यावर भर देऊन येथे ११ पैकी ८ जागा मिळवल्या आहेत. एका जागेवर त्यांना सुमित भोईर यांच्या पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांनी दाखवलेले कसब आणि त्यांनी प्रत्येक विभागाची उचललेली जबाबदारी यामुळे शिवसेना भाजपाच्या वरचढ ठरल्याचे दिसून आले आहे. शिवाय, शिवसैनिकांनी मात्र निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेला एकनिष्ठपणा, एकोपा, ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची धमक, निष्ठावंतांना एकत्रित घेऊन चालण्याची खेळलेली चाल आणि शिवसेनेने जेवढे आयाराम पक्षात घेतले, त्यातील एखाददुसरे नाणे खोटे ठरता इतर नाणी खणखणीत वाजल्याने शिवसेनेला यश मिळाले. एकूणच शिवसेना ठाण्यात भाजपाच्या सर्वच बाजूंनी वरचढ ठरली आणि यातूनच त्यांना एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्न साकार करता आले आहे.