शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कल्याण तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 06:05 IST

कल्याण तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत नऊपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले.

म्हारळ / बिर्ला गेट : कल्याण तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत नऊपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले. भाजपाचे दोन तर एक अपक्ष सरपंच विजयी झाला. दरम्यान, वेहळे ग्रामपंचायतीत कोणाचाच अर्ज न आल्याने हे पद रिक्त घोषित करण्यात आले आहे.तालुक्यातील पळसोली, वासुंर्दी, कोसला, गेरसे, वसत शेलवले, काकडपाडा वेहळे, नांदप आणि कुंदे या ग्रामपंचायतींची निवडणूक सोमवारी झाली. या निवडणुकीत सदस्यपदासाठी ७५ तर सरपंचपदांकरता २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. वेहळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामुळे मंगळवारी उर्वरित आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. त्यात सरपंचपदी गेरसे येथे बाळाराम दिवाणे (३१३ मते), काकपाडा येथे प्रवीण चौधरी (२६१ मते), कुंदे येथे जागृती देवकर (२५५ मते), वासुंद्री रवीश तांडेल (२५३ मते), वसत-शेलवली मधुकर राणे (मते ४५४) हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. पळसोलीच्या विनोद शेंडे यांची बिनविरोध निवड झाली. कोसला येथे शिवाजी पालवी (३१५ मते) आणि नांदप येथे अनंता शेलार (१७५ मते) विजयी झाले.दरम्यान, अच्छे दिन कोण आणणार हे आता नागरिकांना कळून चुकले आहे. प्रत्येकाला स्वत:लाच अच्छे दिन आणावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनीदिली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक