शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'शिवाजी महाराजांवरील पुस्तकावर बंदी घाला, लेखकाला अटक करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 02:09 IST

निरंजन डावखरे : लेखकाला अटक करा

ठाणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लिखाण असलेले ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकावर तातडीने बंदी घालून लेखक डॉ. विनोद अनाव्रत व प्रकाशकाला त्वरित अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली असून तसे निवेदन गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.

या पुस्तकातील जवळजवळ प्रत्येक वाक्यागणिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून दूषणे देण्यात आल्याचा शिवप्रेमी जनतेचा आरोप असल्याचेही त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या वादग्रस्त पुस्तकाचे शीर्षकच आक्षेपार्ह आहे. संपूर्ण पुस्तकातील शीर्षके व उपशीर्षकांमध्ये महाराजांविषयी तुच्छताभाव दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा अवमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. या पुस्तकातील तब्बल ६० पाने ‘रयतेचा खरा राजा कोण : शिवाजी की औरंगजेब’ या प्रकरणावर खर्ची घालून, औरंगजेबला महान दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या पुस्तकातील उतारे काही विशिष्ट मंडळींकडून सोशल मीडियावर वेगाने प्रसारित केले जात आहेत.आंदोलनाचा इशाराच्अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. या पुस्तकावर बंदी न आल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणीही केली आहे.

टॅग्स :thaneठाणे