शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शिवाजी चौक अपघात प्रकरण : आमदार, अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:03 IST

पश्चिमेकडील शिवाजी चौकात मोटारसायकल घसरून आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना २ जून रोजी घडली होती. तशाच अपघाताची पुनरावृत्ती शनिवारी (७ जुलै) झाली. यात मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला.

कल्याण -  पश्चिमेकडील शिवाजी चौकात मोटारसायकल घसरून आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेल्याची घटना २ जून रोजी घडली होती. तशाच अपघाताची पुनरावृत्ती शनिवारी (७ जुलै) झाली. यात मनीषा भोईर यांना जीव गमवावा लागला. दरम्यान, दोन बळी गेल्यानंतर पदाधिकारी आणि अधिका-यांना जाग आली असून रविवारी आ. नरेंद्र पवार यांच्यासह सेनेच्या पदाधिका-यांनी अपघात घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसी आणि केडीएमसीचे अधिकारीही उपस्थित होते. अपघाताला अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचे आ. पवार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अपघातानंतर पालिकेने येथे रस्त्याचे काम सुरू केले आहे.या अपघातात रस्तेबांधणीतले दोष चव्हाट्यावर आले असून रस्ते तयार करताना पेव्हरब्लॉकचा वारेमाप वापर होत असल्याचे समोर आले आहे. पेव्हरब्लॉकमुळे सिमेंट असो अथवा डांबरी रस्त्याची पातळी समान राहत नाही. यामधील चढउतार अपघाताला कारणीभूत ठरतात. हीच रस्त्याची स्थिती आरोहच्या आणि मनीषा यांच्या जीवावर बेतली असून अशा समान पातळी नसलेल्या रस्त्यांकडे लक्ष वेधूनही संबंधित यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.दरम्यान, मनीषा भोईर यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रविवारी दुपारी कल्याण पश्चिमचे आ. नरेंद्र पवार यांनी अपघात झालेल्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे अधिकारी लोकेश कानतोडे आणि महापालिका अधिकारीही उपस्थित होते. पवार यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारी सचिन बासरे, रवींद्र कपोते यांच्यासह स्थानिक नगरसेवक अरुणी गीध या पाहणीदरम्यान पवार यांच्यासोबत होते. तेथेच दोघांचा मृत्यू झाल्याने पवार यांनी संताप व्यक्त केला. आरोहच्या मृत्यूनंतर पवार यांनी महापालिका, एमएसआरडीसीच्या अधिकाºयांकडे या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाºयांनी तेथे दुर्लक्ष केल्याने पुन्हा त्याच ठिकाणी अपघात होऊन महिलेला जीव गमवावा लागला. यामुळे संतप्त पवार यांनी याप्रकरणी महापालिकेचे शहर अभियंता आणि एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, रस्त्याची पाहणी सुरू असताना शिवसेनेचे रवींद्र कपोते यांनी एमएसआरडीसीचे अधिकारी कानतोडे यांची कॉलर पकडून त्यांना सुनावल्याचा प्रकार घडला.आज निषेध आंदोलनरस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघाती बळी पडलेल्या व्यक्तींना उद्या, सोमवारी शिवाजी चौकात अपघात घडलेल्या ठिकाणी जागरूक नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. दुपारी १२ वाजता ‘सेवासुविधा नाही, तर करही नाही’ या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवला जाणार असल्याचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले. रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे आजवर अनेक निष्पाप महिला, दुचाकीस्वार, विद्यार्थी यांना प्राण गमवावे लागले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असल्याकडे घाणेकर यांनी लक्ष वेधले आहे. केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांना निवेदन देणार असून यावेळी शहर पोलीस आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी उपस्थित राहावे, ज्यायोगे कायमस्वरूपी तोडगा काढता येईल, असेही घाणेकर यांनी सांगितले. कल्याण-आग्रा रोड मृत्यूचा अड्डा बनला असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन निष्पाप जीव गेले. याप्रकरणी संबंधित अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे निवेदन कल्याणमधील आपच्या वतीने एमएफसी पोलिसांना देण्यात आले.

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या