शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

जनसुनावणी रद्द करण्याच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा; विविध मच्छीमार संघटनांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:26 IST

आराखड्यात तांत्रिक चुका असल्याचा आरोप

पालघर : प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात मच्छीमारी करणारी गावे, त्यांची घरे आदी दर्शविण्याबाबत तांत्रिक चुका असतानाही हा आराखडा मच्छीमारांच्या माथी मारला जात आहे. यामुळे ३० सप्टेंबरच्या जनसुनावणीला मच्छीमार संघटनांनी विरोध दर्शविला असून या मागणीला शिवसेनेनेही पाठिंबा दिल्याने या लढ्याची ताकद वाढली आहे.

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात मासेमारी गावे, मासेमारी संबंधित प्रत्येक उपक्रम, मच्छीमारांची घरे तसेच नकाशावरील सर्व सीमांकने, वर्गीकरण दर्शविण्यात आलेली नाहीत. हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आणि मच्छीमारांसाठी घातक आहे. याबाबत मच्छीमारांच्या तक्रार निवेदनांचा कोणताही विचार न करता पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपीएस) विषयाबाबतची जनसुनावणी बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी आॅनलाइनद्वारे आयोजित केली आहे.याबाबत नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, पालघर-ठाणे जिल्हा

मच्छीमार समाज संघ, पालघर व वाढवण बंदरविरोधी संघर्ष

समिती यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या सभेत आॅनलाइनद्वारे घेण्यात येणाºया जनसुनावणीस तीव्र विरोध दर्शविला आहे.ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष व ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, नॅशनल

फिश वर्कर्स फोरमच्या सेक्रेटरीज्योती मेहेर, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे सहसचिव वैभववझे, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे उपाध्यक्ष वैभव भोईर,प्रशांत नाईक, सहसचिव जयवंत तांडेल, सदस्य माणेंद्र आरेकर, जगदीश नाईक, भारत देव, शिवनाथ मेर,मुक्ता देव यांनी जिल्हाधिकारीडॉ. माणिक गुरसूळ यांना निवेदन देत जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.

मच्छीमारांना बसणार फटका

शिवसेनेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, तालुकाध्यक्ष विकास मोरे, निलेश राऊत आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढत असताना जनसुनावणी घेऊ नये तसेच पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने नेहमीच विद्युतपुरवठा खंडित होत इंटरनेटची सेवाही सुरळीत नसते. प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसणार आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केल्याचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरfishermanमच्छीमार