शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

जनसुनावणी रद्द करण्याच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा; विविध मच्छीमार संघटनांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:26 IST

आराखड्यात तांत्रिक चुका असल्याचा आरोप

पालघर : प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात मच्छीमारी करणारी गावे, त्यांची घरे आदी दर्शविण्याबाबत तांत्रिक चुका असतानाही हा आराखडा मच्छीमारांच्या माथी मारला जात आहे. यामुळे ३० सप्टेंबरच्या जनसुनावणीला मच्छीमार संघटनांनी विरोध दर्शविला असून या मागणीला शिवसेनेनेही पाठिंबा दिल्याने या लढ्याची ताकद वाढली आहे.

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात मासेमारी गावे, मासेमारी संबंधित प्रत्येक उपक्रम, मच्छीमारांची घरे तसेच नकाशावरील सर्व सीमांकने, वर्गीकरण दर्शविण्यात आलेली नाहीत. हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आणि मच्छीमारांसाठी घातक आहे. याबाबत मच्छीमारांच्या तक्रार निवेदनांचा कोणताही विचार न करता पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तुत प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपीएस) विषयाबाबतची जनसुनावणी बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी आॅनलाइनद्वारे आयोजित केली आहे.याबाबत नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, पालघर-ठाणे जिल्हा

मच्छीमार समाज संघ, पालघर व वाढवण बंदरविरोधी संघर्ष

समिती यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या सभेत आॅनलाइनद्वारे घेण्यात येणाºया जनसुनावणीस तीव्र विरोध दर्शविला आहे.ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष व ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, नॅशनल

फिश वर्कर्स फोरमच्या सेक्रेटरीज्योती मेहेर, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे सहसचिव वैभववझे, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे उपाध्यक्ष वैभव भोईर,प्रशांत नाईक, सहसचिव जयवंत तांडेल, सदस्य माणेंद्र आरेकर, जगदीश नाईक, भारत देव, शिवनाथ मेर,मुक्ता देव यांनी जिल्हाधिकारीडॉ. माणिक गुरसूळ यांना निवेदन देत जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.

मच्छीमारांना बसणार फटका

शिवसेनेच्या वतीने खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, तालुकाध्यक्ष विकास मोरे, निलेश राऊत आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढत असताना जनसुनावणी घेऊ नये तसेच पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने नेहमीच विद्युतपुरवठा खंडित होत इंटरनेटची सेवाही सुरळीत नसते. प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसणार आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केल्याचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघरfishermanमच्छीमार