शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

शिवसेनेचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड. शशिकांत ठोसर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:37 IST

शिवसेनेचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख, प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. शशिकांत ठोसर (७६) यांचे मुंबईतील इस्पितळात कर्करोगावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी निधन झाले. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या ४० निष्ठावंतांपैकी एक अ‍ॅड. ठोसर होते.

डोंबिवली : शिवसेनेचे माजी ठाणे उपजिल्हाप्रमुख, प्रख्यात विधिज्ञ अ‍ॅड. शशिकांत ठोसर (७६) यांचे मुंबईतील इस्पितळात कर्करोगावर उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी निधन झाले. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या ४० निष्ठावंतांपैकी एक अ‍ॅड. ठोसर होते.सायंकाळी त्यांचे पार्थिव त्यांची कन्या अ‍ॅड. शिल्पा भागवत यांच्या सावरकर रोडवरील घरी अंत्यदर्शनाकरिता आणले गेले. रामनगर येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.‘मातोश्री’वर बाळासाहेबांच्या अ‍ॅण्टीचेंबरमध्ये थेट जाणा-या निवडक शिवसैनिकांपैकी अ‍ॅड. ठोसर हे होते. शिवसेनेत गटातटांचे राजकारण सुरू झाल्यानंतर आणि पक्ष ध्येयधोरणांशी प्रतारणा करत आहे, असे जाणवल्यावर त्यांनी स्वत:हून पक्षकार्य थांबवले. मात्र, ते शेवटपर्यंत बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक म्हणून जगले.त्यांच्या शिवाई बालकमंदिर, ग्रीन्स इंग्लिश स्कूल या दोन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी कधीही डोनेशन घेऊन प्रवेश दिले नाही. विद्यार्थी घडवण्यासाठी पैसा नाही, तर ज्ञानदानाची तळमळ लागते, असे ते ठणकावून सांगत. या दोन्ही संस्थांचे २० वर्षे ते अध्यक्ष होते. मराठी भाषा लोप पावत असताना भाषेच्या संवर्धनासाठी वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा त्यांनी भरवल्या. स्वत: उत्तम कबड्डीपटू असलेल्या ठोसर यांनी मुलांमध्ये खिलाडू वृत्ती वाढीस लागावी, याकरिता त्यांनी शिवाई बालक मॅरेथॉन स्पर्धा अनेक वर्षे भरवली.डोंबिवली नगर परिषद काळात शिवसेनेचे निवडून आलेले ते पहिले नगरसेवक होते. रा.स्व. संघाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला बळ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. आपला वकिली व्यवसाय सांभाळून त्यांनी अनेक वर्षे अभिनव सहकारी बँक अध्यक्ष व संचालकपदावर सक्षमपणे काम केले. वकील क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. कल्याण बार असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांच्या दिवंगत पत्नी सीमा ठोसर महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती होत्या. त्यांच्या पश्चात अ‍ॅड. शिल्पा भागवत, अ‍ॅड. आरती देशपांडे या दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड आत्मविश्वास, वक्तशीर, स्पष्टवक्ते, निर्भीड, स्वच्छ-पारदर्शी कारभार, नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्ते, वाचनवेडे, विद्यार्थी घडवण्याची तळमळ, असे आदर्श व्यक्तिमत्त्व ठोसर यांच्या निधनामुळे हरपल्याची भावना जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. राजकारणात दुर्मीळ होत असलेली साधी राहणी हेच ठोसर यांचे वैशिष्ट्य असल्याचे अनेकांनी नमूद केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली