शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

स्थानिकांच्या रोजगाराच्या देण्याच्या नावावर शिवसेनेतील आमदार आणि माजी नगरसेवक आमने सामने

By अजित मांडके | Updated: April 1, 2023 16:23 IST

राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर आता शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात रणसंग्राम सुरु झाला आहे.

ठाणे : ठाणे शहरातील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर मुंबईतील गिरणी कामगारांच्या धर्तीवर ५०० फुटांची घरे व त्याठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शनिवारी वर्तक नगर येथील बिर्ला कंपनीच्या गेटवर आंदोलन केले. परंतु त्याच वेळेस त्यांच्या पक्षातील माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी देखील कंपनीच्या आतमध्ये आंदोलन केल्याचे दिसून आले. केवळ आम्हाला याठिकाणचे काम मिळाले असल्याने तेच खुपल्याने आमदारांनी हे आंदोलन केल्याचा आरोप बारटक्के यांनी केला आहे. परंतु स्थानिकांना न्याय मिळावा या हेतून हे आंदोलन केल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर आता शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात रणसंग्राम सुरु झाला आहे. परंतु आता शिंदे गटातीलच आमदार आणि माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. वर्तकनगर भागात बिर्ला कंपनी बंद असून त्याठिकाणी विकासकाच्या माध्यमातून काम सुरु झाले आहे. याठिकाणी आम्ही स्थानिक याच नात्याने दोन वर्षापूर्वी काम घेतल्याचा मुद्दा बारटक्के यांनी उपस्थित केला. त्यानंतर आम्ही स्थानिकांना न्याय देण्याचे कामही केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु याठिकाणी गिरणी कामगारांच्या धर्तीवर घरे देण्याचा मुद्दा आमदार उपस्थित करीत असतील तर त्याचा आम्हाला आनंद आहे. मात्र स्थानिकांना न्याय मिळावा या हेतून हे आंदोलन नसून स्वत:च्या फायद्यासाठी आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मागील कित्येक वर्षापासून याठिकाणी काम मिळविण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे. परंतु आता तेच आमदारांना खुपत असल्याने त्यांना न्याय हवा असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. अशा चुकीच्या पध्दतीने आंदोलन करणे अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.

मात्र दुसरीकडे सरनाईक यांनी स्थानिकांना न्याय मिळावा, कंपनी बंद पडलेल्यांना रोजगार मिळावा, त्यांना घरे मिळावीत या उद्देशाने हे आंदोलन केले असल्याचा दावा केला आहे. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील चर्चा केली जाणार असून सत्तेत असतांनाही सत्ताधारी पक्षातील आमदाराला अशा पध्दतीने आंदोलन करावे लागते हे दुर्देवी असल्याचेही ते म्हणाले. परंतु कामगारांच्या हितासाठी लढायला देखील तयार असल्याचे ते म्हणाले. त्यानुसार पुढील १५ दिवसात यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मात्र तसे न झाल्यास १ म अर्थात कामगार दिनाच्या दिवशीच प्रत्येक बंद कंपनी बाहेर साखळी उपोषण केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

सरनाईक विरुध्द बारटक्केसरनाईक आणि बारटक्के यांच्यातील हा पहिलाच वाद नसून यापूर्वी देखील त्यांच्यात अनेक मुद्यावरुन खटके उडाल्याचे दिसून आले आहेत. परंतु आता राज्यात सत्ता आल्यानंतर याला विराम लागेल अशी अपेक्षा असतांना त्यांच्यात पुन्हा वाद पेटल्याचे दिसत आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणpratap sarnaikप्रताप सरनाईक