शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उल्हासनगरात पाणी टंचाईच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा; '५० खोके, माजले बोके'च्या घोषणा

By सदानंद नाईक | Updated: September 23, 2022 17:21 IST

शहरातील पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, धोकादायक इमारती आदी मूलभूत समस्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांच्या समोर मांडले.

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील मराठा सेक्शन, ओटी सेक्शन, भीमनगर, संतोषनगर, महादेवनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेवर निषेध मोर्चा काढला. आयुक्त अजीज शेख यांच्यासोबत चर्चा करून निवेदन दिले असून मोर्चात ५० खोके, माजले बोकेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून महापालिका पाणी टंचाई समस्या सोडविण्यात अपयशी ठरली. कॅम्प नं-४ येथील ओटी सेक्शन, मराठा सेक्शन, भीमनगर, संतोषनगर, बंजारा कॉलनी, महादेवनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. स्थानिक माजी नगरसेवक धनंजय बोडारे, शेखर यादव, शीतल बोडारे आदींनी याबाबत महापालिकेकडे पाणी टंचाई बाबत पाठपुरावा केला. मात्र त्यानंतरही पाणी टंचाई कायम राहिल्याच्या निषेधार्थ शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, माजी नगरसेवक शेखर यादव, शीतल बोडारे, वसुधा बोडारे आदींच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी साडे ११ वाजता ओटी सेक्शन ते महापालिका असा मोर्चा काढण्यात आला. 

शहरातील पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, धोकादायक इमारती आदी मूलभूत समस्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजीज शेख यांच्या समोर मांडले. आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वां समक्ष अधिकाऱ्यांना धारेवर धरून पाणी पुरवठा नियमित करण्याचे आदेश देऊन निधीची काळजी करू नका. असे आश्वासन दिले. 

ओटी सेक्शन परिसरात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर नळ जोडण्यात दिल्याचे उघड झाले असून अश्या नळजोडण्या खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शिवसेनेचा मोर्चा महापालिकेवर येतांना शिवसैनिक पाणी टंचाईच्या घोषणा कमी, तर ५० खोके माजले बोके या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटण्यासाठी जात असतानाही ५० खोके, माजले बोके अश्या घोषणेने महापालिका परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेच्या मोर्चात कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड, राजू माने, शिवाजी जावळे, माजी नगरसेवक शेखर यादव, शीतल बोडारे, वसुधा बोडारे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. 

५० खोक्याच्या घोषणाशिवसेनेने महापालिकेवर पाणी टंचाईच्या निषेधार्थ मोर्चा काढला. मात्र मोर्चात पाणी टंचाई ऐवजी ५० खोके, माजले बोकेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून शिवसैनिक आक्रमक झाले होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर