शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

बेकायदा बांधकाम कारवाईविरोधात सेनेची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 01:29 IST

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण : घरे पाडल्याने नागरिकांमध्ये भीती

कसारा  : कसारा येथील वनविभागाच्या जागेवर गोरगरीब नागरिकांनी बेकायदा बांधकामे केली होती. ती बांधकामे वनविभागाने गुरुवारपासून पाडायला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे शेकडो नागरिक भयभीत झाले आहेत. उर्वरित कारवाई शुक्रवारपासून सुरू होणार होती. या कारवाईला विरोध करण्यासाठी शिवसेनेने उडी घेतली.शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य मंजूषा जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी वनविभागाविरोधात जनआंदोलन सुरू केले. सकाळी ८ पासून संपूर्ण कसारा परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून कारवाईला विरोध करीत होते. या आंदोलनासाठी ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जि.प. अध्यक्ष सुषमा लोणे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनास गालबोट लागू नये, यासाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये यांनी वनविभागाचे अधिकारी पी.बी. उबाळे-गुरचळे यांच्याशी चर्चा करून आंदोलनकर्ते यांच्यात समन्वय साधला. आंदोलकांचे शिष्टमंडळ व वनअधिकारी यांच्यात बैठक पार पडली. पाटील यांनी तत्काळ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. कसारा गावातील अतिक्रमण कारवाईबाबत माहिती दिली. या प्रकरणी शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाईस स्थगिती देण्याची सूचना केली. दरम्यान, यापुढे कोणीही अतिक्रमण करू नका, असे आवाहन पाटील यांनी ग्रामस्थांना केले. जी बांधकामे अस्तित्वात आहेत, ती पाडली जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. दरम्यान, आंदोलनास राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. दरम्यान, आंदोलनास राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.कारवाईनंतर अनेक जण आजारीवनजमिनीवरील अतिक्रमण कारवाई सुरू झाल्याने अनेक ग्रामस्थ भयभीत झाले. या कारवाईमुळे अनेक जणांना हृदयविकाराचा त्रास झाला. कोणी रुग्णालयात दाखल झाले. आंदोलनाची सांगता झाल्यावर आमदार दौलत दरोडा यांनी पीडित ग्रामस्थांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली. कसारा येथे जाऊन वनअधिकारी पी.बी. उबाळे-गुरचळे यांची भेट घेत कारवाई थांबवण्याबाबत चर्चा केली. प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.तानाजीनगर येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार नसून नागरिकांनी घाबरू नये. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी तोडगा काढून अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रयत्न करू.        - प्रकाश पाटील,शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुखवनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सहा महिन्यांपासून या ग्रामस्थांना नोटिसा दिल्या जात आहेत. परंतु, नोटीस बजावूनही बेकायदा बांधकाम सुरूच असल्याने कारवाई करणे भाग पडले.    - पी.बी. उबाळे, वनअधिकारी, विहीगाव, कसारा रेंज