शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शिवसेनेने शब्द पाळला नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:51 IST

हाच न्याय शिवसेनेने वनगा यांच्या पश्चात होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबत लावायला हवा होता, अशी आमची इच्छा होती.

कासा : भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारसभेत रविवारी येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, जेव्हा पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाले त्या वेळी शिवसेनेने त्यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी दिली. तेव्हा भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या प्रचारासाठी मी सभा घेतली होती आणि ते विजयी झाले. हाच न्याय शिवसेनेने वनगा यांच्या पश्चात होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबत लावायला हवा होता, अशी आमची इच्छा होती.उद्धवजींशी माझी याबाबत चर्चा झाली होती आणि श्रीनिवासला या पोटनिवडणुकीची उमेदवारी देणार आहोत तर आपण त्याला पाठिंबा द्यावा, असे त्यांना सांगितले होते. त्यांनी मला सुभाष देसार्इंशी चर्चा करायला सांगितली. त्यांच्याशीही माझी चर्चा झाली. श्रीनिवासला आणि वनगा कुटुंबाला कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते; परंतु शिवसेनेने आपला शब्द पाळला नाही. अरे, मोठ्या भावाच्या परिवारात काही उणेदुणे झाले, त्याच्या पुत्राच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले तर धाकट्या भावाने दूर करायचे का त्याला त्या परिवारापासूनच तोडायचे? ही संस्कृती भाजपाची नाही.वनगा यांनी अत्यंत संघर्षाने या जिल्ह्यात पक्षबांधणी केली. आदिवासींच्या समस्यांवर सतत आवाज उठवला. तसाच आवाज राजेंद्र गावीत हे उठवत होते. संघर्ष करीत होते. म्हणून मी त्यांना काही महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो आपण भाजपामध्ये या आणि आपल्या समाजाच्या समस्या सोडवून घ्या. त्यानुसार ते आले, याबद्दल मला समाधान वाटते.मी वनगांना सांगू इच्छितो, त्यांनी शिवसेनेला पुरते ओळखलेले नाही. निवडणुकीपुरती सेनेला वनगा कुटुंबीयांची आठवण झाली आहे. एकदा का निवडणुकीचा निकाल लागला की पराभूत झालेल्या श्रीनिवासकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे शिवसेना ढुंकूनही बघणार नाही. हे त्यांनी आताच लक्षात ठेवावे. आम्ही यापूर्वीही त्यांना वाºयावर सोडले नव्हते आणि यापुढेही सोडणार नाही.गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेली आदिवासींची खावटी चालू करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथील जाहीर सभेत केली.‘छायाचित्र वापरू नका’पालघर : माझे पती दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे छायाचित्र भाजपा सर्वच प्रचार साहित्यावर वापरत आहे. हा वापर तातडीने थांबवावा, असे साकडे वनगा यांच्या पत्नी जयश्री यांनी निवडणूक आयोगाला घातले आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी आपला आक्षेप नोंदविला असून ही बाब आचारसंहितेचा भंग करणारी आहे, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक