शहरं
Join us  
Trending Stories
1
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
2
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
3
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
4
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
5
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
6
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
7
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
8
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
9
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
10
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
11
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
12
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
13
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
14
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
15
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
16
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
17
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
18
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
19
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
20
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!

शिवसेनेने शब्द पाळला नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:51 IST

हाच न्याय शिवसेनेने वनगा यांच्या पश्चात होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबत लावायला हवा होता, अशी आमची इच्छा होती.

कासा : भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या प्रचारसभेत रविवारी येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, जेव्हा पालघरचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाले त्या वेळी शिवसेनेने त्यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी दिली. तेव्हा भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या प्रचारासाठी मी सभा घेतली होती आणि ते विजयी झाले. हाच न्याय शिवसेनेने वनगा यांच्या पश्चात होत असलेल्या पोटनिवडणुकीबाबत लावायला हवा होता, अशी आमची इच्छा होती.उद्धवजींशी माझी याबाबत चर्चा झाली होती आणि श्रीनिवासला या पोटनिवडणुकीची उमेदवारी देणार आहोत तर आपण त्याला पाठिंबा द्यावा, असे त्यांना सांगितले होते. त्यांनी मला सुभाष देसार्इंशी चर्चा करायला सांगितली. त्यांच्याशीही माझी चर्चा झाली. श्रीनिवासला आणि वनगा कुटुंबाला कधीही वाऱ्यावर सोडले नव्हते; परंतु शिवसेनेने आपला शब्द पाळला नाही. अरे, मोठ्या भावाच्या परिवारात काही उणेदुणे झाले, त्याच्या पुत्राच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले तर धाकट्या भावाने दूर करायचे का त्याला त्या परिवारापासूनच तोडायचे? ही संस्कृती भाजपाची नाही.वनगा यांनी अत्यंत संघर्षाने या जिल्ह्यात पक्षबांधणी केली. आदिवासींच्या समस्यांवर सतत आवाज उठवला. तसाच आवाज राजेंद्र गावीत हे उठवत होते. संघर्ष करीत होते. म्हणून मी त्यांना काही महिन्यांपूर्वीच म्हणालो होतो आपण भाजपामध्ये या आणि आपल्या समाजाच्या समस्या सोडवून घ्या. त्यानुसार ते आले, याबद्दल मला समाधान वाटते.मी वनगांना सांगू इच्छितो, त्यांनी शिवसेनेला पुरते ओळखलेले नाही. निवडणुकीपुरती सेनेला वनगा कुटुंबीयांची आठवण झाली आहे. एकदा का निवडणुकीचा निकाल लागला की पराभूत झालेल्या श्रीनिवासकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे शिवसेना ढुंकूनही बघणार नाही. हे त्यांनी आताच लक्षात ठेवावे. आम्ही यापूर्वीही त्यांना वाºयावर सोडले नव्हते आणि यापुढेही सोडणार नाही.गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आलेली आदिवासींची खावटी चालू करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथील जाहीर सभेत केली.‘छायाचित्र वापरू नका’पालघर : माझे पती दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे छायाचित्र भाजपा सर्वच प्रचार साहित्यावर वापरत आहे. हा वापर तातडीने थांबवावा, असे साकडे वनगा यांच्या पत्नी जयश्री यांनी निवडणूक आयोगाला घातले आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी आपला आक्षेप नोंदविला असून ही बाब आचारसंहितेचा भंग करणारी आहे, असेही म्हटले आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूक