शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

‘शिवसेनेने ठाण्याचे वाटोळे केले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:55 IST

ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच शिवसेनेने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असतांनाही आजही शहरात लोडशेंडींगचा प्रश्न कायम आहे, शहरासह कळवा, मुंब्रा या भागात पाच ते सहा तास वीज गायब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सत्तेत असतांना ठाण्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. तसेच आता राज्यासाठी पुरेशी वीजही उपलब्ध आहे. परंतु,असे असतांनाही ठाण्यासारख्या शहराला वीजेचा प्रश्न भेडसावत असेल तर हे सत्ताधारी शिवसेनेचे अपयशच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. नियोजनाचा उडालेला बट्टयाबोळ, पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. शाई धरणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षे खीतपत पडला आहे, त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, किंबहुना या कामाला गती का मिळाली नाही, असा सवालही त्यांनी केला. गडकरी रंगायतनावर आता म्हणे छत अंथरण्याचे काम सुरु आहे. परंतु, आधीच जर त्याचे पीओपी मजबुत केले असते तर आज हा पैसा खर्च करण्याची वेळच का आली असती असा सवालही त्यांनी केला.स्थायी समिती नाहीघाणेकर नाट्यगृहाचे छत कोसळतेच कसे, दीड वर्ष उलटूनही ते खुले का केले नाही, मेट्रोबाबत खंबीर पावले का उचलली जात नाहीत, घनकचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही, रस्त्यांची चाळण झालेली आहे, परिवहनची सेवा सक्षम नाही, महापालिका निवडणूक पार पडूनही स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही, हे सत्ताधारी शिवसेनेचेच पाप असल्याचे ते म्हणाले.