शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

‘शिवसेनेने ठाण्याचे वाटोळे केले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:55 IST

ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच

- लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महापालिकेत मागील २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतांनाही आजही शहरातील वीज, पाणी, घनकचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ नियोजनाचा अभाव असल्यानेच शिवसेनेने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असतांनाही आजही शहरात लोडशेंडींगचा प्रश्न कायम आहे, शहरासह कळवा, मुंब्रा या भागात पाच ते सहा तास वीज गायब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही सत्तेत असतांना ठाण्यातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या होत्या. तसेच आता राज्यासाठी पुरेशी वीजही उपलब्ध आहे. परंतु,असे असतांनाही ठाण्यासारख्या शहराला वीजेचा प्रश्न भेडसावत असेल तर हे सत्ताधारी शिवसेनेचे अपयशच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. नियोजनाचा उडालेला बट्टयाबोळ, पाण्याची समस्या सुटू शकलेली नाही. शाई धरणाचा प्रश्न मागील कित्येक वर्षे खीतपत पडला आहे, त्यावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही, किंबहुना या कामाला गती का मिळाली नाही, असा सवालही त्यांनी केला. गडकरी रंगायतनावर आता म्हणे छत अंथरण्याचे काम सुरु आहे. परंतु, आधीच जर त्याचे पीओपी मजबुत केले असते तर आज हा पैसा खर्च करण्याची वेळच का आली असती असा सवालही त्यांनी केला.स्थायी समिती नाहीघाणेकर नाट्यगृहाचे छत कोसळतेच कसे, दीड वर्ष उलटूनही ते खुले का केले नाही, मेट्रोबाबत खंबीर पावले का उचलली जात नाहीत, घनकचऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे, शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही, रस्त्यांची चाळण झालेली आहे, परिवहनची सेवा सक्षम नाही, महापालिका निवडणूक पार पडूनही स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही, हे सत्ताधारी शिवसेनेचेच पाप असल्याचे ते म्हणाले.