शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शहीद पोलिसांना ठाण्यात मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:31 IST

पोलीस दिनानिमित्त देशभरातील ४२३ शहीद पोलिसांना ‘स्मृती स्तंभाला’ पुष्पचक्र वाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मानवंदना दिली.

ठाणे : पोलीस दिनानिमित्त देशभरातील ४२३ शहीद पोलिसांना ‘स्मृती स्तंभाला’ पुष्पचक्र वाहून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी मानवंदना दिली. सकाळी झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील शहीद पोलीस कुटूंबियांसह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.लडाखमधील भारताच्या बर्फाच्छादित सीमेवरील हॉटस्प्रिंग याठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ रोजी १० पोलीस जवान गस्त घालत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्तर देत अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले. या घटनेचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि राष्टÑनिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयाजवळील स्व. निर्मलादेवी चिंतामणी दिघे उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्षभरामध्ये देशभरात शहीद झालेल्या ४२३ पोलिसांच्या नावांचे वाचन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी केले. पालकमंत्री शिंदे यांनी शहीद स्तंभाला पुष्पचक्र वाहून मानवंदना दिल्यानंतर ठाण्याचे खा. राजन विचारे, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार (गुन्हे शाखा), केशव पाटील (प्रशासन), प्रताप दिघावकर (पूर्व प्रादेशिक विभाग) तसेच ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक महेश पाटील, पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी (ठाणे), संजय शिंदे (कल्याण), प्रमोद शेवाळे (उल्हासनगर), अविनाश अंबुरे (वागळे इस्टेट), दीपक देवराज (गुन्हे शाखा), अमित काळे (वाहतूक नियंत्रण शाखा) आणि मुख्यालयाचे संदीप पालवे यांसह शहीदांच्या कुटूंबियांनीही स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले.>४२३ शहिदांमध्ये महाराष्टÑातील तिघे : गेल्या वर्षभरामध्ये देशभरात ४२३ पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले. यामध्ये महाराष्टÑाच्या मुंबई पोलीस दलातील हवालदार सुनिल कदम, गडचिरोलीचे हवालदार सुरेश गावडे आणि अमरावती ग्रामीणच्या सतिश मढवी यांचा उल्लेख या वेळी करण्यात आला.>आयुक्तालयातील शहीद कर्मचारीठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी असलेले फिरोज कोकणी आणि सलीम बेग यांना पोलीस हवालदार भालचंद्र कर्डीले यांनी ६ मे १९९८ रोजी मुंबईच्या जे. जे. रुगणालयात उपचारासाठी नेले होते. त्यावेळी पोलीस पथकाजवळ येऊन एकाने कर्डीले यांच्या दिशेने गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या बरगडीत लागल्याने ते जखमी होऊन खाली पडले. त्यांना जखमी अवस्थेत जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.उल्हासनगर येथील आरोपी राजेश शिवलानी हा पोलिसांच्या ताब्यातून पळून जात होता. त्यावेळी पोलीस नाईक तुकाराम कदम हे त्याला पाठलाग करुन पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून शहिद झाले.पोलीस हवालदार रमेश जगताप आणि बाळू गांगूर्डे हे ५ जुलै २००६ रोजी निजामपुरा पोलीस ठाणे येथे बंदोबस्तासाठी तैनात होते. पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामास एका गटाने विरोध करुन त्यावेळी दंगल केली. याच दंगलीमध्ये जमावाच्या मारहाणीत जगताप आणि गांगुर्डे हे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले.