शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

अंबरनाथ वडवली भागात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ...

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तो पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊनदेखील दाब कमी असल्याने सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब होत आहे. काही पाण्याच्या टाक्या अर्धवट भरत असल्याने सोसायट्यांना टँकर मागविण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. ही समस्या लक्षात घेऊन मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी या समस्येवर चर्चा केली. जागृत गल्ली आणि परिसरात पर्यायी जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्या ठिकाणी पाण्याचा दाब वाढविल्यास पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनीदेखील सकारात्मकता दर्शविली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा लकडे यांनी दिला आहे.

चिखलोली धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्याने त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, तो पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने अंबरनाथ शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीवन प्राधिकरणावर पाणी बिलापोटी मोठी थकबाकी असल्यानेदेखील एमआयडीसी वाढीव पाणीपुरवठा देण्यास चालढकल करीत आहे.

-------------