शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

अंबरनाथ वडवली भागात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ...

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तो पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊनदेखील दाब कमी असल्याने सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब होत आहे. काही पाण्याच्या टाक्या अर्धवट भरत असल्याने सोसायट्यांना टँकर मागविण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. ही समस्या लक्षात घेऊन मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी या समस्येवर चर्चा केली. जागृत गल्ली आणि परिसरात पर्यायी जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्या ठिकाणी पाण्याचा दाब वाढविल्यास पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनीदेखील सकारात्मकता दर्शविली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा लकडे यांनी दिला आहे.

चिखलोली धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्याने त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, तो पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने अंबरनाथ शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीवन प्राधिकरणावर पाणी बिलापोटी मोठी थकबाकी असल्यानेदेखील एमआयडीसी वाढीव पाणीपुरवठा देण्यास चालढकल करीत आहे.

-------------