शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

अंबरनाथ वडवली भागात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ...

महिनाभरापासून वडवली भागातील अनेक वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. अनेक सोसायट्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तो पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊनदेखील दाब कमी असल्याने सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब होत आहे. काही पाण्याच्या टाक्या अर्धवट भरत असल्याने सोसायट्यांना टँकर मागविण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. ही समस्या लक्षात घेऊन मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी या समस्येवर चर्चा केली. जागृत गल्ली आणि परिसरात पर्यायी जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्या ठिकाणी पाण्याचा दाब वाढविल्यास पाण्याची समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनीदेखील सकारात्मकता दर्शविली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात पाण्याची समस्या न सुटल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा लकडे यांनी दिला आहे.

चिखलोली धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्याने त्याच्या मोबदल्यात एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, तो पाणीपुरवठा अपुऱ्या प्रमाणात होत असल्याने अंबरनाथ शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच जीवन प्राधिकरणावर पाणी बिलापोटी मोठी थकबाकी असल्यानेदेखील एमआयडीसी वाढीव पाणीपुरवठा देण्यास चालढकल करीत आहे.

-------------