शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

दरोडेखोरांना सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: July 8, 2017 05:25 IST

कसारा घाटात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार रुपये लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कसारा घाटात एका प्रवाशाला लिफ्ट देण्याचा बहाणा करून त्याच्याकडून दोन लाख २५ हजार रुपये लुटणाऱ्या पाच दरोडेखोरांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्या. एस. पी. गोगरकर यांनी शुक्रवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.आबिद हमीद खान, जावेद वाहिद खान, आसिफ रफिक शेख, मोहम्मद सलमान मोहम्मद सलिम आणि नीलेश जोशी अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१२ मध्ये मुंबईत राहणारे राहुल जाधव हे द्वारका नाक्यावर गाडीच्या प्रतीक्षेत थांबले होते. आरोपींनी त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा केला. गाडीत बसवून त्यांना कसारा घाटात नेले. तेथे त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. त्यानंतर त्यांना वाटेत सोडून दिले. याप्रकरणी जाधव यांनी दरोडेखोरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणात अ‍ॅडहोक कोर्टाने पाचही जणांना सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा रद्द करावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश गोगरकर यांच्याकडे अपील केले होते. ते गोगरकर यांनी फेटाळून लावताना अ‍ॅडहोक कोर्टाने दिलेल्या शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणात सरकारी वकील अ‍ॅड. अश्विनी भामरे-पाटील यांनी कामकाज पाहिले.सराईत गुन्हेगारशिक्षा सुनावलेले पाचही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वीही त्यांनी गुजरात महामार्गावर एका वृद्ध दांम्पत्याला लुबाडले होते. ही बाब खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच काही साक्षीदार न्यायालयाने तपासले होते.