शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

बर्ड फ्लू नियंत्रणासाठी जिल्ह्यात सात पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:15 IST

जिल्ह्यातील बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी ठामपाचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय धुमाळ, ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,

ठाणे : जिल्ह्यात बर्ड फ्लूबाबत आरोग्य, पशुसंवर्धन यंत्रणा सतर्क आहे. याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना करण्यासाठी सात पथके नेमली आहेत.  महापालिकांनीही त्यांच्या स्तरावर पथके स्थापन केली आहेत. यामुळे जनतेने घाबरू नये. अफवांवरही विश्वास ठेवू नये. बर्ड फ्लूविषयी कोणी अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची तंबीही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील बर्ड फ्लूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी ठामपाचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विजय धुमाळ, ठाणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. लक्ष्मण पवार, उपवनसंरक्षक हिरे व सर्व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. सात पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण प्राधान्याने पूर्ण करून पशुवैद्यकीय विभागाबरोबरच ग्रामपंचायत, वनविभाग पातळींवर निगराणीचे आदेशही त्यांनी दिले. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील तेथे लक्ष देण्याच्या सूचना वनविभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याशिवाय जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षही स्थापन केला आहे. 

‘चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका’बर्ड फ्लूसंदर्भात अपुऱ्या व चुकीच्या माहितीवर कोणी जर दिशाभूल केली अथवा अफवा पसरविल्या तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करू, असा सक्त इशारा नार्वेकर यांनी दिला. पोल्ट्री व्यावसायिकांनी सर्व कर्मचारी मास्क, सॅनिटायझरचा वापर करतील, स्वच्छता पाळतील याची दक्षता घ्यावी तसेच विक्रेत्यांनीही खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

नियंत्रण कक्षाला कळवा nकावळे, पोपट, बगळे, स्थलांतरित होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळल्यास तत्काळ माहिती द्यावी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. nजिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी ०२२-२५६०३३११ तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ वर संपर्क साधावा. नागरिकांनी मृत पक्ष्यांची  विल्हेवाट लावू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने ते खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणे