शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

शेतकऱ्यांचे भात खरेदीचे सात कोटी रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:17 IST

४२ हजार क्विंंटल सरकारकडे जमा : २१ गोदामांमध्ये ठेवला साठवून

शेणवा : केंद्र शासनाच्या आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने ठाणे-रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून एक हजार सातशे पन्नास रूपये प्रति क्विंटल दराने नोव्हेंबर २०१८ ते २० फेब्रुवारी २०१९ या तीन महिन्यांत १७ कोटी २० लाख ७१ हजार ३७५ रुपयांचा ९८ हजार ३२६.५० क्विंटल भात खरेदी करून भाडेतत्त्वावर घेतलेल्या २१ गोदामांत ठेवला आहे.

शेतकऱ्यांना यातील ५६ हजार ४५४ क्विंटल भाताचे ९ कोटी ९८ लाख रुपये अदा करण्यात आले. २६ हजार सहाशे क्विंटल भाताच्या ५ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. तर १६ हजार १८५ क्विंटल भाताच्या २ कोटी ६३ लाख २३ हजार ७५० रु पयांची मागणी करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक विनय एडगे यांनी सांगितले. दरम्यान, शासनाकडे ४२ हजार क्विंटल भाताचे ७ कोटी रखडल्याने शेतकºयांत उदासीनता असून रखडलेली रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत शासनाने यंदा भात खरेदीसाठी २६जानेवारी रोजी मान्यता दिल्यानुसार आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने शहापूर तालुक्यात १० कोटी ३२ लाख २७ हजार ७५ रुपयांचा ५८ हजार ९८६.९ क्विंटल भात खरेदी करून भातसानगर, पेंढरघोळ, सावरोली, नेवरे, खर्डी, अघई, बेडिसगांव, वेहळोली, चोंढे येथील बारा गोदामात ठेवला आहे. मुरबाड तालुक्यात ६ कोटी १५ लाख ७ हजार सातशे ७ रु पयांचा ३५ हजार एकशे ८६.९ क्विंटल भात खरेदी करून खापरी, माल, आगिवली येथील तीन गोदामात ठेवला आहे. कर्जत तालुक्यात ७२ लाख ६७ हजार ९२५ रुपयांचा ४ हजार १५२.७० क्विंटल भात गोदामात ठेवला आहे. 

खरेदी भाताची रक्कम, मंजुरीसाठी शासनाला सादर करावे लागणारे दस्तऐवज बहुतांश शेतकरी वेळेवर सादर करीत नसल्याने मंजुरीस विलंब लागत असून खरेदी भाताची हुंडी शासनाला सादर केली असून मंजुरीनंतर शेतकºयांना त्यांची रक्कम अदा करण्यात येईल.- विनय एडगे, उपप्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळरजेवर असल्याने याबाबतची माहिती देऊ शकत नसून कार्यालयाशी संपर्क साधून ही माहिती घ्यावी.- नरेंद्र रणमाळे, प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार