शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

केडीएमसीचा सिक्वेल आता ठाण्यात

By admin | Updated: October 21, 2016 04:27 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देण्यापूर्वीच येथील शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी सुरू केलेली

- अजित मांडके,  ठाणेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देण्यापूर्वीच येथील शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची ताकद भाजपाच्या शक्तीपेक्षा कितीतरी अधिक असल्याने आपले संख्याबळ टिकवून ठेवणे व काही प्रमाणात वाढवणे, हेच शिवसेनेचे लक्ष्य आहे, तर तोळामासा प्रकृतीच्या भाजपाचा सत्ता स्थापनेपेक्षा आपले संख्याबळ जेवढे वाढवता येईल, तेवढे वाढवणे हाच हेतू आहे. त्यामुळे शेजारील कल्याण-डोंबिवली महापालिकेतील संघर्षाचा आणि निकालाचा सिक्वेल ठाण्यात मतदारांना पाहायला मिळणार आहे.ठाणे हे वर्षानुवर्षे शिवसेनेचेच असल्याने भाजपाने आतापर्यंत या शहरातील संघटनेकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, मोदीलाटेच्या जोरावर लोकसभा आणि विधानसभेत भाजपाने ठाण्यात जोरदार मुसंडी मारल्याने आता शिवसेनेच्या मैदानात पाय रोवण्याची हीच संधी असल्याचे भाजपाला वाटते. विधानसभेतील यशाचा फायदा पालिका निवडणुकीत होईल, असा कयास होता. परंतु, आरक्षण सोडत जाहीर झाली आणि सोडतीचा फायदा शिवसेनेलाच अधिक होईल, असा भीतीचा गोळा भाजपाच्या पोटात आला. त्यामुळे युतीसाठी काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. परंतु शिवसेनेनेच स्वबळावर लढण्याची भाषा केल्याने भाजपाची पंचाईत झाली आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेकडे २४ जागा मागितल्या होत्या. परंतु, अखेरच्या क्षणी त्यांना २२ जागांवर समाधान मानावे लागले. त्यापैकी ८ नगरसेवक विजयी झाले. शिवसेनेने आधीपासून स्वबळाची मोर्चेबांधणी केली आहे. चार वॉर्डांचा मिळून एक पॅनल असल्याने त्याचा फायदा शिवसेनेलाच अधिक होईल, असे सध्याचे तरी चित्र आहे. स्वबळाचा निर्णय लादला गेलाच तर विधानसभेच्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्याकरिता सर्व शक्ती पणाला लावण्याची तयारी भाजपाने केली आहे. जुने ठाणे, घोडबंदरचा काही पट्टा, कोपरी, वागळेतील काही भाग, टेंभीनाका, जांभळीनाका, नौपाडा आदींसह इतर भागांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाला आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे ठाकरे यांचा स्वबळाचा नारा ठाण्यात भाजपाची दमछाक करण्याची शक्यता अधिक आहे.शिवसेनेचा गड खेचण्याचा होता विचारठाणे शहर मतदारसंघाते भाजपाला ७० हजार ८८४ मते तर, शिवसेनेला ५१ हजार १० मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यात ७२८६ मतांची वाढ जरी झाली असली तरी वाढलेल्या मतदारांपुढे ही वाढ फारच कमी आहेत. कोपरी-पाचपाखाडीत शिवसेनेला १ लाख ३१६ मते मिळाली, तर भाजपाने येथे ५० हजारांची आघाडी घेतली होती. ओवळा-माजिवडामध्ये शिवसेनेला ६५ हजार ५७१ मते तर भाजपाला ५७ हजार ६६५ मते मिळाली होती. कळवा-मुंब्रामध्ये शिवसेनेला ३८ हजार ८५० मते पडली होती. तर, भाजपाला १२ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. त्यामुळेच २९ वर्षे शिवसेनेकडे असलेला ठाण्याचा गड आपल्याकडे खेचण्याचा विचार भाजपाचा होता.